शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

विश्वासात न घेतल्याने व्यापाऱ्यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:11 IST

नाशिक : शहरातील विविध बाजारपेठांमध्ये प्रवेशासाठी पाच रुपये आकारण्याचा निर्णय मनपा व पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आल्याने विविध ...

नाशिक : शहरातील विविध बाजारपेठांमध्ये प्रवेशासाठी पाच रुपये आकारण्याचा निर्णय मनपा व पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आल्याने विविध व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनाने व्यापाऱ्यांना विचारात घेणे आवश्यक होते, असे मत व्यापाारी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.

कोट...

गर्दी करण्यासाठी उपाययोजना करण्यास विरोध नाही; मात्र व्यापारीवर्गाला काय अडचणी येऊ शकतात. याचा विचार करता त्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. तसे केले असते तर या वर्गाचे सहकार्यच लाभले असते.

- संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

कोट-

शहरातील बाजारपेठा शनिवारी व रविवारी बंद ठेवण्यासोबतच वेळेचे निर्बंध यापूर्वीच लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाच एका ग्राहकाने बाजारपेठेत एक तासच थांबयचे, तर तो खरेदी कशी करणार आणि दुकानदारांनी धंदा कसा करायचा अशा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा निर्णय घेताना प्रशासनाने व्यापारी संघटनांना विश्वासात घेणे आवश्यक होते.

-दिग्विजय कापडिया, अध्यक्ष, कापड विक्रेता महासंघ

कोट-

नाशिक सराफ असोसिएशनने यापूर्वीही प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र यावेळी बाजारपेठेत शुल्क आकारण्यासोबतच निर्बंध लादताना प्रशासनाने विश्वासात घेतले असते तर व्यापारीही काही सूचना करू शकले असते. परंतु, प्रशासनाने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतला असून, यात दुकानदार, कामगार यांच्या येण्याजाण्यासंदर्भात कोणत्याही स्पष्ट सूचना नाही.

-गिरीश नवसे, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

कोट-

ग्राहकांना बाजारपेठेत खरेदीसाठी येताना शुल्क आकारण्याचा निर्णय लोकशाही मूल्यांना धरून नाही. अशाप्रकारे ग्राहक बाजारपेठेबाहेरच अडवले गेले तर व्यावसायिकांनी व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापेक्षा यापूर्वीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आ‌वश्यक होते.

- मयूर काळे, अध्यक्ष, नाशिक भांडी विक्रेता असोसिएशन