शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

व्यापाऱ्यांना ‘एप्रिल’ फूल

By admin | Updated: March 18, 2015 23:50 IST

एलबीटी : आॅगस्टपासून रद्दच्या घोषणेमुळे नाराजी

नाशिक : व्यापाऱ्यांना त्रासदायक वाटणारा स्थानिक स्वराज्य संस्था कर म्हणजेच एलबीटी हा १ एप्रिलपासून रद्द करण्याच्या घोषणेबाबत युती सरकारने घूमजाव केले असून, व्यापाऱ्यांना चक्क एप्रिल फूल केले आहे. एप्रिल ऐवजी १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करणार असल्याचे सरकारने जाहीर केले असले, तरी त्याविषयी व्यापाऱ्यांबरोबरच उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता जीएसटी लागू करण्याच्या नावाखाली पुन्हा हा निर्णय लांबणीवर टाकला जाण्याची भीती संबंधितांनी व्यक्त केली आहे.राज्यात भाजपा सेनेचे सरकार येण्यापूर्वीच त्यांनी व्यापाऱ्यांच्या एलबीटी हटाव भूमिकेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर मात्र केंद्र सरकार सर्व कर रद्द करून एकमेव जीएसटी लागू केल्यानंतर एलबीटी लागू करू, असे सांगत सरकारने वेळोवेळी भूमिका बदलली आणि आता १ एप्रिल म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून एलबीटी रद्द करू असे सांगताना बुधवारी अर्थसंकल्प सादर करताना १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांनी खूश होण्याऐवजी नाराजीचा सूर काढला आहे.नाशिकमधील फामचे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी राज्य सरकारने व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. १ एप्रिलपासून एलबीटी रद्द करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच जाहीर केले होते; मात्र आता घूमजाव करीत १ आॅगस्टपासून एलबीटी लागू करणार असल्याचे जाहीर केले असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी राज्य सरकारकडून व्यापाऱ्यांची फसगत होत असल्याचा आरोप केला. आता १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले; परंतु पुन्हा पुढील आर्थिक वर्षापासून जीएसटी सुरू होणार असल्याने तोपर्यंत एलबीटीला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे, असे मत व्यक्त केले. निमाचे अध्यक्ष रवि वर्मा यांनी कर भरतानाच्या प्रक्रियेचे सुलभीकरण करावे, अशी उद्योजकांची इच्छा होती. मात्र आर्थिक वर्षाच्या सुरुवातीऐवजी मध्येच एलबीटी रद्द करून गोंधळ निर्माण होईल, असे सांगितले, तर आॅल इंडिया फेडरेशन आॅफ क्लॉथ रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांनी १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द मात्र व्हॅटमध्ये सरचार्ज वाढणार असल्याने नगरपालिकांमधील व्यापाऱ्यांना त्याचा भुर्दंड बसेल, असे सांगितले. (प्रतिनिधी)