शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नगरसूलला विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 01:04 IST

नगरसूल : येवला तालुक्यातील नगरसूल येथील दादमळा प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सकाळी अल्पोपाहाराच्यावेळी देण्यात आलेल्या दूध आणि खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (दि.६) घडली. मुलांना उलट्या होऊ लागल्याने पालकांनी त्यांना तातडीने नगरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, २२ विद्यार्थ्यांना विषबाधेचा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ठळक मुद्देदादमळा शाळेतील प्रकार । ग्रामीण रुग्णालयात उपचार

नगरसूल : येवला तालुक्यातील नगरसूल येथील दादमळा प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सकाळी अल्पोपाहाराच्यावेळी देण्यात आलेल्या दूध आणि खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (दि.६) घडली. मुलांना उलट्या होऊ लागल्याने पालकांनी त्यांना तातडीने नगरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, २२ विद्यार्थ्यांना विषबाधेचा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.नेहमीप्रमाणे दादमळा शाळेत मुलांना दुध व खिचडी देण्यात आली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी दूध घेण्यास नापसंती दर्शविली होती. परंतु, काही विद्यार्थ्यांनी दूध व नंतर खिचडी घेतल्याने काही तासातच मुलांना शाळा उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे मुले घाबरून गेली. या घटनेमुळे पालकांचीही एकच तारांबळ उडाली आणि मुलांना नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरु वातीला विषबाधा झालेल्या एक-दोन विद्यार्थ्यांची संख्या संध्याकाळपर्यंत बावीसवर जाऊन पोहोचली. विद्यार्थ्यांवर नगरसूल ग्रामीण रु ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. सूर्यवंशी, एस.आर. कांबळे, आरोग्य सेवक एन.डी. तिरसे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, ज्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली त्यांना घरी पाठविण्यात येत आहे. दरम्यान, सदर घटना घडताच जिल्हा परिषद सदस्या सविता पवार, बाळासाहेब पवार, कांतिलाल साळवे, सरपंच प्रसाद पाटील, ग्रामविकास अधिकारी गोरख निकम, उमेश देशमुख आदींनी रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली तर रु ग्णालय प्रशासनाने येवला तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे...या विद्यार्थ्यांना झाली विषबाधाअमृता पैठणकर, निखिल पैठणकर, तनुषा घाडगे, राहुल कोल्हे, पूनम पैठणकर, पवन पैठणकर, अमृता मोरे, राधा मोरे, सार्थक जाधव, वर्षा पैठणकर, कृष्णा पैठणकर, सोनाली पवार, जिजाबाई गायकवाड, एकनाथ गायकवाड, अंकिता पैठणकर, कैलास जाधव, आकाश जाधव, साहेबराव पवार, ईश्वर पवार या आठ ते दहा वयोगटातील बावीस मुलांना विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल विद्यार्थ्यांची संख्या बावीस झाली असून, सुरुवातीला मुलांना होत असलेल्या उलट्या व दिसणाऱ्या लक्षणावरून विषबाधा झाल्याचे निदर्शनात आले आहे. विषबाधा दुधासारख्या पदार्थातून झाली आहे. आता मुलांची प्रकृती स्थिर आहे.-डॉ. एस. डी. सूर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षकप्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया अल्पोपाहारात अंडी, दूध हे बंद करण्यात यावे. त्यात गुणवत्ता राहत नाही. याऐवजी बिस्कीटे देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. याबाबत आम्ही प्रशासनाला त्याबाबत विनंती केली आहे.- विजय पोपट पैठणकर, पालक