शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

टोलची लूट सुरुच, आता नाशिककरांवर टोलवाढीचा बोजा

By admin | Updated: May 9, 2014 08:18 IST

गेल्या वर्षभरात दोन वेळा चर्चेचा ठरलेला राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका पुन्हा एकदा टोल दरवाढीने वादात सापडला असून, लोकसभेची रणधुमाळी संपताच टोल वसूल कंपनीने सोमवारपासून चौपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : गेल्या वर्षभरात दोन वेळा चर्चेचा ठरलेला राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका पुन्हा एकदा टोल दरवाढीने वादात सापडला असून, लोकसभेची रणधुमाळी संपताच टोल वसूल कंपनीने सोमवारपासून चौपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महामार्गावर अद्यापही कामे अपूर्ण असताना आकारल्या जाणार्‍या टोलला विरोध करण्याचा इशारा आमदार अनिल कदम यांनी दिला आहे. निफाडचे आमदार अनिल कदम यांच्याशी झालेल्या वादानंतर पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका राज्यात चर्चेत आला होता. त्यानंतर मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच टोल वसूल करणार्‍या पी.एन.जी. या कंपनीने टोलदरात वाढ करण्यासाठी वर्तमानपत्रांतून जाहिरात दिली होती. टोलवाढीमुळे निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करतानाच, स्थानिक आमदार व जनतेने टोलवाढीविरुद्ध उठाव केला असता जिल्हाधिकार्‍यांनी मध्यस्थी करून स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा कंपनीने सोमवारपासून टोलदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी वाहनांवर आकारण्यात येणार्‍या टोलच्या चौपट हा दर असून, त्यामुळे वाहनधारकांचे कंबरडेच मोडणार आहे. लहान वाहनांसाठी १४० रुपये, हलके व व्यावसायिक वाहनांसाठी २२० रुपये, बस व ट्रकसाठी ४४५ व अवजड वाहनांसाठी ६७५ रुपये एकेरी टोल आकारण्यात येणार आहे. -----------उड्डाणपुलामुळे टोलवाढओझर-पिंपळगाव बसवंत येथील कामे अपूर्ण असली तरी, गेल्या वर्षी जूनमध्ये खुला करण्यात आलेला नाशिकमधील सर्वात लांबीच्या उड्डाणपुलामुळे पिंपळगाव बसवंत येथील टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. शासनाने तसा करारच केला असल्यामुळे टोल वसुलीशिवाय पर्यायच नाही. सध्या वाढविला जाणारा टोल हा फक्त कंपनीने जितके काम केले त्यावरच आकारला आहे. - खोडस्कर, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण