शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

टमाटा, भाजीपाल्यापाठोपाठ कांदा दरातही घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:16 IST

शेतमालास योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आधीच त्रस्त आहे. टमाटा, मिरची, शिमला मिरची, कोबी फ्लॉवर, कारले, भोपळा, ...

शेतमालास योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आधीच त्रस्त आहे. टमाटा, मिरची, शिमला मिरची, कोबी फ्लॉवर, कारले, भोपळा, भेंडी व इतर भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागला. कवडीमोल दरामुळे केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने तोटाच सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी उभ्या भाजीपाला पिकात जनावरे सोडली तर काहींनी पिकात रोटर फिरवून आपला संताप व्यक्त केला आहे. आता तर कांद्याचे दरही दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गावर चिंतेचे सावट पसरले असून, तो पूर्णतः हवालदिल झाला आहे. बाजार समित्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीत आवक कमी होऊनही दर कमी होत आहे .

पिकांना मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव मिळावा म्हणून ओरड करीत आहे मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशाही स्थितीत या पिकात नाही, तर दुसऱ्या पिकात झालेले नुकसान भरून निघेल या आशेवर शेतकरी विविध पिके शेतात घेत आहेत मात्र कोणत्याच पिकास भाव मिळत नसल्यामुळे आर्थिक गणित कोलमडत असून, शेतकरी देशोधडीला लागला आहे.

कांद्याचे आगार असलेल्या या भागातील शेतकऱ्यांनी साठ ते सत्तर हजारांपेक्षा जास्त खर्च करून मोठ्या आशेने पिकविलेल्या कांद्यास कमी भाव मिळत आहे. सरासरी एक एकर शेतात पिक चांगले आल्यास चार ट्रॅक्टर कांद्याचे उत्पन्न मिळते. एका ट्रॅक्टरमध्ये सरासरी पंधरा क्विंटल कांदा असतो. आजच्या बाजार दरानुसार शेतकऱ्यांना फक्त एकरी तीस ते चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे.

कांद्याच्या या आगारामध्ये शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करीत भाजीपाला पिके घेतली मात्र त्यांनाही बाजारात भाव मिळत नसल्याने भाजीपाला शेळ्या, मेंढ्या व जनावरांना खाऊ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बाजारात नेलेली भाजी जनावरांच्या पुढे टाकून देण्याची वाईट वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कोट...

बाजारभाव वाढतील व शेतीस भांडवल उपलब्ध होईल म्हणून चाळीत साठवून ठेवलेला सुमारे दोनशे क्विंटल कांदा खराब झाल्याने उकिरड्यावर फेकून द्यावा लागला. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना सावरण्यासाठी खराब कांद्याचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी .

- अमोल गायकवाड, धुळगाव

कोट...कांदा उत्पादन घेण्यासाठी एकरी एक लाखापर्यंत खर्च केला. बियाणातही भेसळ निघाल्याने संपूर्ण पिकाला डोंगळे निघाले. पुढील काळात दर वाढतील म्हणून कांदा चाळीत साठवून ठेवला, मात्र कांदा खराब झाला आहे. तसेच सध्या बाजारात मिळत असलेल्या दराने उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा.

- भास्कर शेळके, ठाणगाव

फोटो - १० पाटोदा १

100921\10nsk_34_10092021_13.jpg

ठाणगाव येथे कांदा चाळीत खराब झालेला कांदा.