शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

मार्केट बंदमुळे टोमॅटो, भोपळे फेकले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:13 IST

येवला/पाटोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करून जिल्ह्यातील सर्व बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे लिलावासाठी बाजार ...

येवला/पाटोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करून जिल्ह्यातील सर्व बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे लिलावासाठी बाजार बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. माल विक्रीची कोणतीही सोय नसल्याने येवला तालुक्यातील पाटोदा येथील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत संताप व्यक्त केला. नांदूर शिवारातील शेतकऱ्याला पिकविलेला भोपळा फेकून देण्याची वेळ आली आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले होते. यातून ते कसेबसे सावरत नाही तोच, कोरोनामुळे गेल्या चार दिवसांपासून बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले आहेत. सध्या काकडी, दोडका, गिलका, भोपळा शेतमालाचा हंगाम असल्याने शेतात फळभाज्या तयार झालेल्या आहेत, परंतु मोठ्या प्रमाणावर आलेला हा माल दोन, चार किलो विक्री करणे शेतकऱ्याला शक्य नाही. शिवाय दिवसभर शहरात विक्रीसाठी बसून राहणे देखील परवडणारे नाही. अशातच बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव बंद असल्याने तेथेही विक्री करता येत नाही. तयार फळभाज्यांचा वेळेत खुडा झाला नाही तर फळभाज्यांचा आकार वाढून त्या खराब होतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फळभाज्या शेतात खुडून टाकाव्या लागत आहेत. तर काही शेतकरी आपल्या जनावरांना खाण्यासाठी फळभाज्या टाकत आहेत.

--------------------

शेत मशागतीची कामे सुरू

खरीप हंगाम तोंडावर आला आहे त्यामुळे शेतकरी वर्गाने भर उन्हात खरीप पूर्व शेतमशागतीची कामे सुरू केली आहेत.सध्या शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. नांगरणी,शेतातील ढेकळ फोडणे,जमीन सपाटीकरण करणे आशा शेतकामात शेतकरी वर्ग व्यस्त झाला आहे;मात्र गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर गगनाला भिडल्याने शेत मशागत महागल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक फटका बसत आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरत आपली प्रगती केली आहे.बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली असून सर्वच शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत.

------------

निसर्गाच्या लहरीपणामुळे संकट

शेतकरी वर्ग नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडत आहे.त्यात मागील वर्षांपासून कोरोना महामारीची भर पडली आहे.संकट कमी होण्याऐवजी गडद होत असल्याने शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाला अडचणीचा सामना करावा लागत आहे.खरीप हंगाम दहा पंधरा दिवसांवर आला आहे. बाजार समित्या व बाजारपेठ बंद असल्याने शेतात उत्पादित भाजीपाला व शेतमाल विक्री अभावी शेतात पडून आहे. उत्पादित केलेला माल विकता येत नसल्याने खरीप हंगामासाठी भांडवल कसे उभे करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. भाजीपाला बांधावर फेकून देण्याची वेळ आली आहे.

-------------

इंधनाचे दर गगनाला भिडल्याने शेतमशागत महागली आहे,ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे करणे अवघड झाले आहे.इंधन दरवाढीमुळे आर्थिक गणित बिघडले आहे.ट्रॅक्टर मालकांनीही मशागतीच्या दरात मोठी वाढ केली आहे.त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.

-ज्ञानेश्वर बोरनारे, शेतकरी, पाटोदा (१५ भोपळा)

===Photopath===

150521\15nsk_9_15052021_13.jpg

===Caption===

१५ भोपळा