शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांचे अनुदान रखडले

By admin | Updated: February 2, 2016 23:50 IST

स्वच्छ भारत अभियान : ९७३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण

नाशिक : केंद्र व राज्य सरकारमार्फत स्वच्छ भारत (नागरी) अभियानांतर्गत ६०७३ ठिकाणी शौचालय उभारणीचा कार्यक्रम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आला असून, आतापर्यंत ९७३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर ८५५ शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. महापालिकेने ४२१७ लाभार्थ्यांना निम्मे अनुदान अदा केले; परंतु पुढील अनुदान रखडल्याने शौचालय उभारणीच्या कार्यक्रमाला खीळ बसली आहे.केंद्र व राज्य सरकारमार्फत स्वच्छ भारत (नागरी) अभियानअंतर्गत घरोघरी शौचालय उभारणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार, नाशिक महापालिकेने सात महिन्यांपूर्वी शहरात सर्वेक्षण केले असता ५१ हजार ५८४ कुटुंबांच्या घरात शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले होते, तर ४४ हजार ६८० कुटुंबांकडून सार्वजनिक शौचालयांचा वापर होत असल्याचे समोर आले होते. ७१७४ कुटुंबे मात्र उघड्यावरच शौचविधी पार पाडत असल्याचे आढळून आले. त्यानुसार, महापालिकेने सदर ७१५४ कुटुंबांकडून शौचालय उभारणीसंबंधी अर्ज भरून घेतले होते. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर त्यातील ८७७ अर्ज तांत्रिक मुद्द्यांवरून बाद ठरविण्यात आले. एकूण ६०७३ लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधून दिले जाणार असून, त्यांना त्यासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान अदा केले जाणार आहे. सध्या महापालिकेने प्रती लाभार्थ्यास सहा हजार रुपये अनुदानाचा पहिला हप्ता वितरित केला आहे. त्यानुसार आतापर्यंत ४२१७ लाभार्थ्यांना सुमारे २ कोटी ५३ लाख २ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. सद्यस्थितीत शहरात ९७३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, ८५५ शौचालयांचे काम सुरू आहे. महापालिकेने २ आॅक्टोबर २०१५ पासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीला सुरुवात केली. सन २०१६ पर्यंत महापालिकेने सुमारे ३ हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. अद्याप उद्दिष्टाप्रमाणे ११७२ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. महापालिकेने शौचालयांच्या बांधकाम प्रगतीचा अहवाल सादर करत आणखी अनुदानाच्या रकमेची मागणी शासनाकडे केली असून, अद्याप निधी वर्ग न झाल्याने कामकाजाला खीळ बसली आहे.