शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

आजपासून आदिमायेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:28 IST

सप्तशृंगगड : नवरात्रोत्सवासाठी सज्ज; भाविकांमध्ये उत्साह कळवण : उत्तर महाराष्टÑाचे आराध्यदैवत व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (दि. २१) प्रारंभ होत असून, उत्सवासाठी प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

सप्तशृंगगड : नवरात्रोत्सवासाठी सज्ज; भाविकांमध्ये उत्साह

कळवण : उत्तर महाराष्टÑाचे आराध्यदैवत व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (दि. २१) प्रारंभ होत असून, उत्सवासाठी प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली आहे.सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व ग्रामपंचायत नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले असून, यात्रा कालावधीत खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नांदुरी येथून गडावर जाण्यासाठी अवघ्या पाच पाच मिनिटाला परिवहन महामंडळाच्या बसेस भाविकांसाठी उपलब्ध असणार आहेत. भाविकांची सुरक्षाविषयक जबाबदारी पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. देवीभक्त व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे.राज्याच्या विविध भागातून गडावर येणाºया लाखो भाविकांसाठी सप्तशृंगी निवासिनी देवी न्यासाने धर्मशाळेच्या खोल्या, राजराजेश्वरी इमारतीच्या खोल्या व सभागृह उपलब्ध करून दिले आहे. बसस्थानकाजवळील जागेत चप्पल स्टॅण्डची व्यवस्था करण्यात आली आहे.पहिल्या पायरीपासून मंदिराच्या सभामंडपापर्यंत साफसफाई व रंगरंगोटी करण्यात आली आहे. गाभारा, दरवाजे, चांदीचा महिरप यावर रोशणाई करण्यात आली आहे. भाविकांना पहिल्या पायरीपासून मंदिरापर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. मंदिरात जाण्यासाठी पहिल्या पायरीपासून मंदिरापर्यंत ठिकठिकाणी टप्प्याटप्प्याने बाºया लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना मेटल डिटेक्टर दरवाजे व हॅण्ड डिटेक्टरच्या तपासणीतून जावे लागणार आहे. नारळ फोडण्याची व्यवस्था पहिल्या पायरीजवळ करण्यात आली आहे. तपासणीमुळे गर्दी होऊ नये याची काळजी घेण्याच्या पोलीस यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.बोकडबळी बंदीवर जिल्हाधिकारी ठामश्री सप्तशृंग गडावर बोकडबळी प्रथा बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ही प्रथा बंद करण्याचेच फर्मान कायम केले. भाविकांची सुरक्षितता व या प्रथेमुळे होणारी पशुहत्या रोखण्यासाठी न्यायव्यवस्थेनेच बंदी घातली असल्याचे सांगत महसूल प्रशासनाने दि. १५ सप्टेंबर रोजी उपविभागीय महसूल अधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीरकेला होता. कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी याबाबत सप्तंशृग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त व व्यवस्थापक, कर्मचारी यांना स्पष्टपणे सांगितले की, देवस्थान ट्रस्टमार्फत बोकडबळी दिला गेला तर संबंधित यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हीच भूमिका वरिष्ठ अधिकारीवर्गानेही ठेवल्याने आता ही प्रथा बंद होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.