शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आजपासून आदिमायेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:28 IST

सप्तशृंगगड : नवरात्रोत्सवासाठी सज्ज; भाविकांमध्ये उत्साह कळवण : उत्तर महाराष्टÑाचे आराध्यदैवत व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (दि. २१) प्रारंभ होत असून, उत्सवासाठी प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

सप्तशृंगगड : नवरात्रोत्सवासाठी सज्ज; भाविकांमध्ये उत्साह

कळवण : उत्तर महाराष्टÑाचे आराध्यदैवत व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (दि. २१) प्रारंभ होत असून, उत्सवासाठी प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली आहे.सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व ग्रामपंचायत नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले असून, यात्रा कालावधीत खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नांदुरी येथून गडावर जाण्यासाठी अवघ्या पाच पाच मिनिटाला परिवहन महामंडळाच्या बसेस भाविकांसाठी उपलब्ध असणार आहेत. भाविकांची सुरक्षाविषयक जबाबदारी पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. देवीभक्त व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे.राज्याच्या विविध भागातून गडावर येणाºया लाखो भाविकांसाठी सप्तशृंगी निवासिनी देवी न्यासाने धर्मशाळेच्या खोल्या, राजराजेश्वरी इमारतीच्या खोल्या व सभागृह उपलब्ध करून दिले आहे. बसस्थानकाजवळील जागेत चप्पल स्टॅण्डची व्यवस्था करण्यात आली आहे.पहिल्या पायरीपासून मंदिराच्या सभामंडपापर्यंत साफसफाई व रंगरंगोटी करण्यात आली आहे. गाभारा, दरवाजे, चांदीचा महिरप यावर रोशणाई करण्यात आली आहे. भाविकांना पहिल्या पायरीपासून मंदिरापर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. मंदिरात जाण्यासाठी पहिल्या पायरीपासून मंदिरापर्यंत ठिकठिकाणी टप्प्याटप्प्याने बाºया लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना मेटल डिटेक्टर दरवाजे व हॅण्ड डिटेक्टरच्या तपासणीतून जावे लागणार आहे. नारळ फोडण्याची व्यवस्था पहिल्या पायरीजवळ करण्यात आली आहे. तपासणीमुळे गर्दी होऊ नये याची काळजी घेण्याच्या पोलीस यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.बोकडबळी बंदीवर जिल्हाधिकारी ठामश्री सप्तशृंग गडावर बोकडबळी प्रथा बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ही प्रथा बंद करण्याचेच फर्मान कायम केले. भाविकांची सुरक्षितता व या प्रथेमुळे होणारी पशुहत्या रोखण्यासाठी न्यायव्यवस्थेनेच बंदी घातली असल्याचे सांगत महसूल प्रशासनाने दि. १५ सप्टेंबर रोजी उपविभागीय महसूल अधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीरकेला होता. कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी याबाबत सप्तंशृग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त व व्यवस्थापक, कर्मचारी यांना स्पष्टपणे सांगितले की, देवस्थान ट्रस्टमार्फत बोकडबळी दिला गेला तर संबंधित यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हीच भूमिका वरिष्ठ अधिकारीवर्गानेही ठेवल्याने आता ही प्रथा बंद होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.