शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

आजपासून आदिमायेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:28 IST

सप्तशृंगगड : नवरात्रोत्सवासाठी सज्ज; भाविकांमध्ये उत्साह कळवण : उत्तर महाराष्टÑाचे आराध्यदैवत व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (दि. २१) प्रारंभ होत असून, उत्सवासाठी प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

सप्तशृंगगड : नवरात्रोत्सवासाठी सज्ज; भाविकांमध्ये उत्साह

कळवण : उत्तर महाराष्टÑाचे आराध्यदैवत व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (दि. २१) प्रारंभ होत असून, उत्सवासाठी प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली आहे.सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व ग्रामपंचायत नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले असून, यात्रा कालावधीत खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नांदुरी येथून गडावर जाण्यासाठी अवघ्या पाच पाच मिनिटाला परिवहन महामंडळाच्या बसेस भाविकांसाठी उपलब्ध असणार आहेत. भाविकांची सुरक्षाविषयक जबाबदारी पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. देवीभक्त व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे.राज्याच्या विविध भागातून गडावर येणाºया लाखो भाविकांसाठी सप्तशृंगी निवासिनी देवी न्यासाने धर्मशाळेच्या खोल्या, राजराजेश्वरी इमारतीच्या खोल्या व सभागृह उपलब्ध करून दिले आहे. बसस्थानकाजवळील जागेत चप्पल स्टॅण्डची व्यवस्था करण्यात आली आहे.पहिल्या पायरीपासून मंदिराच्या सभामंडपापर्यंत साफसफाई व रंगरंगोटी करण्यात आली आहे. गाभारा, दरवाजे, चांदीचा महिरप यावर रोशणाई करण्यात आली आहे. भाविकांना पहिल्या पायरीपासून मंदिरापर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. मंदिरात जाण्यासाठी पहिल्या पायरीपासून मंदिरापर्यंत ठिकठिकाणी टप्प्याटप्प्याने बाºया लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना मेटल डिटेक्टर दरवाजे व हॅण्ड डिटेक्टरच्या तपासणीतून जावे लागणार आहे. नारळ फोडण्याची व्यवस्था पहिल्या पायरीजवळ करण्यात आली आहे. तपासणीमुळे गर्दी होऊ नये याची काळजी घेण्याच्या पोलीस यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.बोकडबळी बंदीवर जिल्हाधिकारी ठामश्री सप्तशृंग गडावर बोकडबळी प्रथा बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ही प्रथा बंद करण्याचेच फर्मान कायम केले. भाविकांची सुरक्षितता व या प्रथेमुळे होणारी पशुहत्या रोखण्यासाठी न्यायव्यवस्थेनेच बंदी घातली असल्याचे सांगत महसूल प्रशासनाने दि. १५ सप्टेंबर रोजी उपविभागीय महसूल अधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीरकेला होता. कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी याबाबत सप्तंशृग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त व व्यवस्थापक, कर्मचारी यांना स्पष्टपणे सांगितले की, देवस्थान ट्रस्टमार्फत बोकडबळी दिला गेला तर संबंधित यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हीच भूमिका वरिष्ठ अधिकारीवर्गानेही ठेवल्याने आता ही प्रथा बंद होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.