शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

आजपासून रंगणार बारापर्यंत दांडिया

By admin | Updated: October 9, 2016 01:15 IST

मर्यादा शिथिल : भाविकांत उत्साह

नाशिक : सुरुवातीचे तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे आनंदावर विरजण पडलेल्या दांडियाप्रेमींना रविवार व सोमवार असे दोन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत गरबा खेळण्याची मुभा शासनाने दिली असून, वाद्य वाजविण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंतची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे सलग तीन दिवस दांडियाप्रेमींचा हिरमोड झाला. विशेष करून तरुण-तरुणींच्या उत्साहावर विरजण पडले. त्यानंतर पावसाने उघडीप दिलेली असली तरी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री दहा वाजेपर्यंतच वाद्य वाजविण्यास अनुमती असल्याने व दांडियासाठी रात्री नऊ ते दहा वाजेनंतरच तरुण-तरुणी बाहेर पडत असल्याने त्यांना पुरेसा वेळ मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वयेच मिळालेल्या सवलतीचा विचार करून राज्य सरकारने ज्या काही दिवसांसाठी रात्री दहा वाजेची अट शिथिल केली त्यात नवरात्रोत्सवात अष्टमी व नवमी या दोन दिवसांचा समावेश आहे. रविवारी अष्टमी व सोमवारी नवमी असून, या दोन्ही दिवशी दांडिया व गरबाप्रेमींना रात्री बारा वाजेपर्यंत आनंद लुटता येणार आहे. (प्रतिनिधी)