शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

सीईओंची खातेप्रमुखांना तंबी : कालमर्यादेचा अल्टिमेटम

By admin | Updated: July 10, 2016 01:03 IST

‘जलयुक्त’चा कोट्यवधीचा निधी अखर्चित

नाशिक : जिल्हा परिषदेला राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या २१ कोटींतून अवघे साडेआठ कोटीच खर्च झाल्याचे आकडेवारी सांगत असल्याने हा निधी वेळेत खर्च न झाल्यास त्याची जबाबदारी खातेप्रमुखांवर येण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.शनिवारी (दि.९) मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रावसाहेब थोरात सभागृहात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होेते. लघुपाटबंधारे पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी त्यांच्या विभागाकडील आढावा देताना सांगितले की, त्यांच्या विभागाला शासनाकडून जलयुक्त शिवार अभियानासाठी जो विशेष निधी म्हणून सहा कोटी ४० लाख रुपये प्राप्त झाले होते, ते जूनअखेर शंभर टक्के खर्च होण्याचे नियोजन आम्ही केले होते. त्यानुसार आता जुलैमध्ये संबंधित कामे पूर्ण झाली आहेत. किरकोळ स्वरूपाची कामे बाकी आहेत, तीही तातडीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लघुपाटबंधारे पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब देसले यांनी त्यांच्या विभागाचा आढावा सादर करताना शासनाकडून १० कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी आजमितीस पाच कोटी ८२ लाखांची कामे पूर्ण झाली आहेत. काही कामे किरकोळ स्वरूपात बाकी आहेत, ती पूर्ण झाल्यावर ८ कोटींचा निधी जवळपास जूनअखेर खर्च होईल, असे आम्ही नियोजन केले आहे. तरीही पूर्व विभागाचा दोन कोटींचा निधी खर्च न होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळेच बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निधी शंभर टक्के खर्च होऊन जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाची कामे तातडीने पूर्ण करावीत, निधी खर्च न झाल्यास त्याची जबाबदारी खातेप्रमुखांची असेल, असा इशारा यावेळी दिला. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्यासह लघुपाटबंधारे विभागाचे बहुतांश उपअभियंते उपस्थित होते. (प्रतिनिधी)