शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव खोऱ्यात शेतमजुरांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:37 IST

नायगाव : यंदा हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकºयांची मोठी निराशा केली आहे. पाण्याअभावी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे शेतकºयांसह शेतमजुरांचेही काम कमी झाल्याने शेतीवर अवलंबून असणारे सर्वच व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नायगाव खोºयात आलेल्या शेकडो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देसर्वच व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दत्ता दिघोळे ।नायगाव : यंदा हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकºयांची मोठी निराशा केली आहे. पाण्याअभावी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे शेतकºयांसह शेतमजुरांचेही काम कमी झाल्याने शेतीवर अवलंबून असणारे सर्वच व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नायगाव खोºयात आलेल्या शेकडो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.परतीच्या पावसाची आशा धुसर होत असल्यामुळे येणाºया काळात सर्वांनाच दुष्काळाचे चटके सोसावे लागणार असल्याचे चित्र आहे. जून महिना उजाडण्याच्या आधीपासूनच समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. समाधानकारक पाऊस पडेल या आशेवर बळीराजाने खरिपाची पेरणी केली. टमाटे, कोबी, फ्लॉवर आदी पिकांची मातीमोल भावात विक्री करावी लागली, तर खरिपात शेतकºयांना हमखास आर्थिक आधार देणाºया सोयाबीनचे दाणे भरण्यास सुरुवात होताच पावसाने दडी मारल्याने हजारो एकर क्षेत्रातील सोयाबीन पीक शेतातच करपले. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.शेतकºयांच्या हातात येणारे उत्पन्न तुटपुंजे असल्यामुळे शेतीवर अवलंबून असलेले सर्वच व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार थंडावले असल्याने बाजारात शुकशुकाट पहायला मिळत आहे. संपूर्ण पावसाळ्यात एकही जोरदार पाऊस पडला नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. आगामी काळात पाऊस पडला नाही तर रब्बी हंगामही धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांसह सामान्य नागरिकालाही येणाºया काळात दुष्काळ व पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागणार आहे. (क्रमश:) शासनाने दुष्काळी जिल्हा ठरविण्यासाठी लावलेले निकष कठोर आहेत. हे नियम बघता सिन्नर तालुक्यातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत असतानाही बहुतांशी गावे या निकषामुळे दुष्काळाच्या नुकसानभरपाई व अन्य सुविधांपासून वंचित राहणार असल्याची स्थिती आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचा विचार करून शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याची गरज आहे.- दत्ताराम डोमाड, शिवसेना तालुका उपप्रमुखमागील हंगामात मी अडीच एकर क्षेत्रात सोयाबीनचे पीक घेतले होते. त्यात वीस क्विंटल सोयाबीन झाली होती. यावर्षी तेवढ्याच क्षेत्रात सात क्विंटल सोयाबीन झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादनात मोठी घट निर्माण झाल्याने आर्थिक गणित बिघडले आहे.- संपत गिते, शेतकरी, जायगावसिन्नर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सोयाबीन सोंगणीच्या कामासाठी कोकणपट्टीतून हजारो मजूर येत असतात. यावर्षी कोकणातही पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने येणाºया मजुरांचे प्रमाणही वाढले आहे; मात्र सोयाबीनचे उत्पादन एकरी पाच ते सहा क्विंटलने घटले आहे. त्यामुळे कोकणातून आलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. अनेक मजुरांना दररोज काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.