शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

नायगाव खोऱ्यात शेतमजुरांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:37 IST

नायगाव : यंदा हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकºयांची मोठी निराशा केली आहे. पाण्याअभावी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे शेतकºयांसह शेतमजुरांचेही काम कमी झाल्याने शेतीवर अवलंबून असणारे सर्वच व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नायगाव खोºयात आलेल्या शेकडो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देसर्वच व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दत्ता दिघोळे ।नायगाव : यंदा हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकºयांची मोठी निराशा केली आहे. पाण्याअभावी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे शेतकºयांसह शेतमजुरांचेही काम कमी झाल्याने शेतीवर अवलंबून असणारे सर्वच व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नायगाव खोºयात आलेल्या शेकडो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.परतीच्या पावसाची आशा धुसर होत असल्यामुळे येणाºया काळात सर्वांनाच दुष्काळाचे चटके सोसावे लागणार असल्याचे चित्र आहे. जून महिना उजाडण्याच्या आधीपासूनच समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. समाधानकारक पाऊस पडेल या आशेवर बळीराजाने खरिपाची पेरणी केली. टमाटे, कोबी, फ्लॉवर आदी पिकांची मातीमोल भावात विक्री करावी लागली, तर खरिपात शेतकºयांना हमखास आर्थिक आधार देणाºया सोयाबीनचे दाणे भरण्यास सुरुवात होताच पावसाने दडी मारल्याने हजारो एकर क्षेत्रातील सोयाबीन पीक शेतातच करपले. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.शेतकºयांच्या हातात येणारे उत्पन्न तुटपुंजे असल्यामुळे शेतीवर अवलंबून असलेले सर्वच व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार थंडावले असल्याने बाजारात शुकशुकाट पहायला मिळत आहे. संपूर्ण पावसाळ्यात एकही जोरदार पाऊस पडला नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. आगामी काळात पाऊस पडला नाही तर रब्बी हंगामही धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांसह सामान्य नागरिकालाही येणाºया काळात दुष्काळ व पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागणार आहे. (क्रमश:) शासनाने दुष्काळी जिल्हा ठरविण्यासाठी लावलेले निकष कठोर आहेत. हे नियम बघता सिन्नर तालुक्यातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत असतानाही बहुतांशी गावे या निकषामुळे दुष्काळाच्या नुकसानभरपाई व अन्य सुविधांपासून वंचित राहणार असल्याची स्थिती आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचा विचार करून शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याची गरज आहे.- दत्ताराम डोमाड, शिवसेना तालुका उपप्रमुखमागील हंगामात मी अडीच एकर क्षेत्रात सोयाबीनचे पीक घेतले होते. त्यात वीस क्विंटल सोयाबीन झाली होती. यावर्षी तेवढ्याच क्षेत्रात सात क्विंटल सोयाबीन झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादनात मोठी घट निर्माण झाल्याने आर्थिक गणित बिघडले आहे.- संपत गिते, शेतकरी, जायगावसिन्नर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सोयाबीन सोंगणीच्या कामासाठी कोकणपट्टीतून हजारो मजूर येत असतात. यावर्षी कोकणातही पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने येणाºया मजुरांचे प्रमाणही वाढले आहे; मात्र सोयाबीनचे उत्पादन एकरी पाच ते सहा क्विंटलने घटले आहे. त्यामुळे कोकणातून आलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. अनेक मजुरांना दररोज काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.