शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

यंदा आंबा करणार तोंड गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:17 IST

वटार : मध्यंतरी अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर पोषक वातावरण तयार झाल्याने ग्रामीण भागातील आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून त्यावर मोहर बहरल्याने यंदा उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देमोहर बहरला : उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज

वटार : मध्यंतरी अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर पोषक वातावरण तयार झाल्याने ग्रामीण भागातील आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून त्यावर मोहर बहरल्याने यंदा उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.             बागलाणच्या पश्चिम पट्यात गावरान जातीची मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे आहेत. त्यात गोट्या,सेंद्रया, काळ्या, ढवळ्या, दोडी आदी जातीची झाडे आहेत. तर काही शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचे नवीन केसर सारख्या आंब्याच्या जाती देखील लावल्या आहेत. मध्यंतरी पडलेल्या थंडीमुळे आंब्याने मोठ्या प्रमाणावर मोहर बहरल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे उच्चांकी पिकाची अपेक्षा आहे.          गेली चार वर्ष लहरी निसर्गाचा फटका बसल्यामुळे सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर राहिलेला आंबा यंदा सर्वांचे तोंड गोड करण्याची चिन्हे आहेत. दिवसभर वारा चालू असल्यामुळे मोहर काहीसा गळून जात आहे. काही आंब्यावर आलेला मोहोर कुजू लागला असून असा मोहोर काळा पडत आहे. त्यामुळे आंब्याच्या उत्पादनाला फटका बसण्याचीही भीती आहे. ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.                         मागील वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षी आंबे कमी फुटले आहेत व वाऱ्यामुळे मोहरही गळत आहे. बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादनात घट होण्याची भीती आहेच पण पोषक वातावरण मिळाले तर आंबा भाव खाणार आहे.- बाळू खैरनार, शेतकरी, वटार. 

टॅग्स :agricultureशेतीMangoआंबा