शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

सप्तशृंगगडवासीयांवर पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST

(नीलेश कदम) सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाने ...

(नीलेश कदम)

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाने तळ गाठल्याने गेल्या दहा दिवसांपासून येथील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण करत भटकंती सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गतवर्षी व यावर्षी चैत्र उत्सव यात्रा कोरोना साथीच्या रोगांमुळे प्रशासनाने रद्द केल्या होत्या. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता व यात्रा नसल्या कारणाने थोड्याफार प्रमाणात पाण्याची बचत झाली. परंतु गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

----------------------------

गाळ न काढल्याने टंचाई

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी भवानी पाझर तलावाचा गाळ काढला गेला पाहिजे. परंतु तसे झाले नाही. गेल्या बऱ्याच वर्षापासून पाझर तलावातला गाळ काढला गेला नाही. मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. पाऊस पडण्यापूर्वी जर ग्रामपंचायतीने लक्ष घालून दरवर्षी गाळ काढला तर थोड्याफार प्रमाणात का होईना पाणीटंचाई दूर होईल.

----------------------------

ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष

ग्रामस्थांचा पाणी नसल्यामुळे संताप होऊ नये व समजूत काढण्यासाठी भवानी पाझर तलावाचा पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी. आपला सर्वांचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे, आपण शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहे. लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळून नवीन धरणाचे काम चालू होणार आहे. सप्तशृंगगड सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशी शक्कल लढवत असा संदेश व्हाट्सॲपद्वारे गावातील ग्रुपवर पसरविण्यात येत असून ग्रामपंचायतीकडून वेळ मारून नेली जात आहे.

-------------------------

अगोदरच व्यवसाय ठप्प, त्यात टंचाई

धरणाचे काम जेव्हा चालू होईल तेव्हा होईल तोपर्यंत पाण्याचे काय नियोजन? असा संतप्त सवाल येथील महिला वर्गाकडून केला जात आहे. येथील ग्रामस्थांना तसेच वयोवृद्ध महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तसेच नाईलाजाने हजार ते १२०० रुपये देऊन टॅंकरवाल्यांकडून पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र येथे पहावयास मिळत आहे. एकीकडे कोरोना साथीच्या रोगांमुळे प्रशासनाने सर्व धार्मिक स्थळे बंद केले आहे येथील व्यवसाय बंद आहेत, पैसे आणायचे तरी कुठून, अशी अवस्था येथील ग्रामस्थांची झाली आहे.

-------------------

ट्रँकर उपलब्ध करून द्या

सप्तशृंगगड हे पावसाचे माहेरघर समजले जाते. परंतु यंदा जुलै महिना अर्धा उलटूनही गेल्याने वरुण राजाने पाठ फिरवली आहे. याची खंत ग्रामस्थ करीत आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठीची परवड थांबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा गडावर पाण्याचे टॅंकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

-----------------

सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलावाने तळ गाठला. (१५ गड)

150721\15nsk_6_15072021_13.jpg

१५ गड