शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सप्तशृंगगडवासीयांवर पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST

(नीलेश कदम) सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाने ...

(नीलेश कदम)

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाने तळ गाठल्याने गेल्या दहा दिवसांपासून येथील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण करत भटकंती सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गतवर्षी व यावर्षी चैत्र उत्सव यात्रा कोरोना साथीच्या रोगांमुळे प्रशासनाने रद्द केल्या होत्या. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता व यात्रा नसल्या कारणाने थोड्याफार प्रमाणात पाण्याची बचत झाली. परंतु गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

----------------------------

गाळ न काढल्याने टंचाई

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी भवानी पाझर तलावाचा गाळ काढला गेला पाहिजे. परंतु तसे झाले नाही. गेल्या बऱ्याच वर्षापासून पाझर तलावातला गाळ काढला गेला नाही. मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. पाऊस पडण्यापूर्वी जर ग्रामपंचायतीने लक्ष घालून दरवर्षी गाळ काढला तर थोड्याफार प्रमाणात का होईना पाणीटंचाई दूर होईल.

----------------------------

ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष

ग्रामस्थांचा पाणी नसल्यामुळे संताप होऊ नये व समजूत काढण्यासाठी भवानी पाझर तलावाचा पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी. आपला सर्वांचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे, आपण शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहे. लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळून नवीन धरणाचे काम चालू होणार आहे. सप्तशृंगगड सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशी शक्कल लढवत असा संदेश व्हाट्सॲपद्वारे गावातील ग्रुपवर पसरविण्यात येत असून ग्रामपंचायतीकडून वेळ मारून नेली जात आहे.

-------------------------

अगोदरच व्यवसाय ठप्प, त्यात टंचाई

धरणाचे काम जेव्हा चालू होईल तेव्हा होईल तोपर्यंत पाण्याचे काय नियोजन? असा संतप्त सवाल येथील महिला वर्गाकडून केला जात आहे. येथील ग्रामस्थांना तसेच वयोवृद्ध महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तसेच नाईलाजाने हजार ते १२०० रुपये देऊन टॅंकरवाल्यांकडून पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र येथे पहावयास मिळत आहे. एकीकडे कोरोना साथीच्या रोगांमुळे प्रशासनाने सर्व धार्मिक स्थळे बंद केले आहे येथील व्यवसाय बंद आहेत, पैसे आणायचे तरी कुठून, अशी अवस्था येथील ग्रामस्थांची झाली आहे.

-------------------

ट्रँकर उपलब्ध करून द्या

सप्तशृंगगड हे पावसाचे माहेरघर समजले जाते. परंतु यंदा जुलै महिना अर्धा उलटूनही गेल्याने वरुण राजाने पाठ फिरवली आहे. याची खंत ग्रामस्थ करीत आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठीची परवड थांबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा गडावर पाण्याचे टॅंकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

-----------------

सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलावाने तळ गाठला. (१५ गड)

150721\15nsk_6_15072021_13.jpg

१५ गड