शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

टॅँकरचा खर्च कमी करण्यावर भर थकीत बिल भरणार

By admin | Updated: May 30, 2014 01:07 IST

नाशिक : उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी टंचाई कृती आराखड्यात सुचविलेल्या उपाययोजनांऐवजी सरसकट टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून ठेकेदाराचे हित जोपासणार्‍या सरकारी यंत्रणेला शासनाने चांगलीच चपराक दिली असून, टॅँकरवर होणार्‍या खर्चात बचत व कपात करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक : उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी टंचाई कृती आराखड्यात सुचविलेल्या उपाययोजनांऐवजी सरसकट टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून ठेकेदाराचे हित जोपासणार्‍या सरकारी यंत्रणेला शासनाने चांगलीच चपराक दिली असून, टॅँकरवर होणार्‍या खर्चात बचत व कपात करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणार्‍या पाणीटंचाईचा सामना करण्यापूर्वी ऑक्टोबरपासूनच पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविल्या जाव्यात असे शासनाचे धोरण असून, जिल्हा परिषदेने त्याबाबतचा टंचाई कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करावी, असे ठरविण्यात आले आहे. परंतु पहिल्या दोन टप्प्यात या आराखड्याची अंमलबजावणीच होत नसल्याने शेवटच्या तिसर्‍या टप्प्यात उन्हाचा वाढलेला तडाखा पाहून सरकारी यंत्रणेकडून फक्त टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर दिला जातो. दरवर्षी कोट्यवधी रुपये निव्वळ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावरच उधळले जातात. त्यापेक्षा टंचाई दूर करण्यासाठी या निधीचा वापर व्हावा, अशी सूचना वारंवार केली जाते. यंदाही राज्यात सर्वत्र टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे पाहून टॅँकरवर होणारा खर्च कमी करण्यासाठी शासनानेच पावले उचलली आहेत. विशेष करून टंचाईग्रस्त गावांमधील हंगामी पाणीपुरवठा योजना वा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वीज देयक थकल्याने बंद पडली असेल व त्यामुळे संबंधित गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असेल तर अशा योजना सुरू करण्यासाठी टंचाई निधीतून वीज देयके अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या विहिरींना पाइपलाइन व विद्युत मोटारी बसविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या विहिरीच्या पाण्याचा वापर पेयजलाकरिताच केला जावा, असेही शासनाने नमूद केले आहे. या उपाययोजनांमुळे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर होणार्‍या खर्चात बचत होईल, असे शासनाचे म्हणणे आहे. टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांनामे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी अधिक प्रमाणात होऊ लागल्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने पाणीपुरवठा करता यावा यासाठी टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३० जूनपर्यंत हे अधिकार कायम राहतील.