शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

टॅँकरचा खर्च कमी करण्यावर भर थकीत बिल भरणार

By admin | Updated: May 30, 2014 01:07 IST

नाशिक : उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी टंचाई कृती आराखड्यात सुचविलेल्या उपाययोजनांऐवजी सरसकट टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून ठेकेदाराचे हित जोपासणार्‍या सरकारी यंत्रणेला शासनाने चांगलीच चपराक दिली असून, टॅँकरवर होणार्‍या खर्चात बचत व कपात करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक : उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी टंचाई कृती आराखड्यात सुचविलेल्या उपाययोजनांऐवजी सरसकट टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून ठेकेदाराचे हित जोपासणार्‍या सरकारी यंत्रणेला शासनाने चांगलीच चपराक दिली असून, टॅँकरवर होणार्‍या खर्चात बचत व कपात करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणार्‍या पाणीटंचाईचा सामना करण्यापूर्वी ऑक्टोबरपासूनच पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविल्या जाव्यात असे शासनाचे धोरण असून, जिल्हा परिषदेने त्याबाबतचा टंचाई कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करावी, असे ठरविण्यात आले आहे. परंतु पहिल्या दोन टप्प्यात या आराखड्याची अंमलबजावणीच होत नसल्याने शेवटच्या तिसर्‍या टप्प्यात उन्हाचा वाढलेला तडाखा पाहून सरकारी यंत्रणेकडून फक्त टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर दिला जातो. दरवर्षी कोट्यवधी रुपये निव्वळ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावरच उधळले जातात. त्यापेक्षा टंचाई दूर करण्यासाठी या निधीचा वापर व्हावा, अशी सूचना वारंवार केली जाते. यंदाही राज्यात सर्वत्र टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे पाहून टॅँकरवर होणारा खर्च कमी करण्यासाठी शासनानेच पावले उचलली आहेत. विशेष करून टंचाईग्रस्त गावांमधील हंगामी पाणीपुरवठा योजना वा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वीज देयक थकल्याने बंद पडली असेल व त्यामुळे संबंधित गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असेल तर अशा योजना सुरू करण्यासाठी टंचाई निधीतून वीज देयके अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या विहिरींना पाइपलाइन व विद्युत मोटारी बसविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या विहिरीच्या पाण्याचा वापर पेयजलाकरिताच केला जावा, असेही शासनाने नमूद केले आहे. या उपाययोजनांमुळे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर होणार्‍या खर्चात बचत होईल, असे शासनाचे म्हणणे आहे. टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांनामे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी अधिक प्रमाणात होऊ लागल्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने पाणीपुरवठा करता यावा यासाठी टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३० जूनपर्यंत हे अधिकार कायम राहतील.