शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

मजूर संघाच्या अध्यक्षपदी वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 22:53 IST

कळवण : नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या अध्यक्षपदी कळवणचे हरिभाऊ वाघ, तर उपाध्यक्षपदी नाशिकच्या आशाताई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देबिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी आशाताई चव्हाण; कार्यकर्त्यांचा जल्लोष

कळवण : नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या अध्यक्षपदी कळवणचे हरिभाऊ वाघ, तर उपाध्यक्षपदी नाशिकच्या आशाताई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.जिल्हा मजूर संघाचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी कासव व उपाध्यक्ष प्रमोद भाबड यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी निवडणूक निर्णय अधिकारी सहकार उपनिबंधक प्रेरणा शिवदास यांच्या उपस्थितीत निवडणूक झाली.अध्यक्षपदासाठी कळवणचे हरिभाऊ वाघ यांच्या नावाची सूचना संपतराव सकाळे यांनी मांडली. तिला योगेश हिरे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी नाशिकच्या आशाताई चव्हाण यांच्या नावाची सूचना संभाजी पवार यांनी मांडली. शिवाजी रौंदळ यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निर्धारित वेळेत एकेक अर्ज दाखल झाल्याने वाघ व चव्हाण बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांनी केली. संघाच्या वतीने यावेळी हरिभाऊ वाघ, आशाताई चव्हाण, मावळते अध्यक्ष शिवाजी कासव, प्रमोद भाबड, प्रेरणा शिवदास यांचा सत्कार करण्यात आला.जिल्ह्यातील प्राथमिक मजूर सहकारी संस्थाच्या हितासाठी, संवर्धनासाठी व अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असून, मजूर संस्थाना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ वाघ यांनी सत्काराप्रसंगी दिली. यावेळी संपतराव सकाळे, शिवाजी कासव, प्रतिभा शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले.निवडीप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा पाटील, मजूर संघाचे संचालक राजेंद्र भोसले, संपतराव सकाळे, शिवाजी रौंदळ, योगेश हिरे, दिनकर उगले, संभाजी पवार, नीलेश आहेर, जगन्नाथ वाजे, चिंतामण गावित, प्रमोद मुळाणे, सतीश सोमवंशी, योगेश गोलाईत, सुरेश भोये, विठ्ठल वाजे, शशिकांत आव्हाड, शशिकांत उबाळे, अर्जुन चुंभळे, प्रतिभा शिरसाठ, रमेश शिरसाठ आदी उपस्थित होते.कळवणची परंपरा कायमजिल्हा मजूर संघाच्या कळवण तालुका संचालकपदासाठी आतापर्यंतच्या निवडणुका लाखमोलाने चुरशीच्या केल्या आहेत. त्यामुळे कळवणमधून संचालक झालेला मजूर संघाचा प्रतिनिधी जिल्हा संघावर पदाधिकारी होतो, ही गेल्या २५ वर्षांची परंपरा यंदा हरिभाऊ वाघ यांनी कायम ठेवून कळवणकडे अध्यक्षपद खेचून आणले. याआधी अंबादास अहिरराव (१९७७-७८), केदा अहेर (२०००-०१), शरद गुंजाळ (२००८-०९) यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. तसेच कौतिक पगार, रवींद्र देवरे, योगेश पगार व संगीताताई देवरे यांनी उपाध्यक्षपद भूषविले आहे.