शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट रेल्वेचे; प्रवास एसटीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:44 IST

आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी झालेल्या अपघातानंतर इगतपुरी येथे थांबविण्यात आलेल्या तीनही एक्स्प्रेसमधील प्रवाशांना एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून कल्याणपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेचे तिकीट दाखवून कल्याणपर्यंतचा प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती, यामुळे सुमारे सातशेपेक्षा अधिक प्रवाशांना कल्याणपर्यंत पोहचणे शक्य झाले.

नाशिक : आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी झालेल्या अपघातानंतर इगतपुरी येथे थांबविण्यात आलेल्या तीनही एक्स्प्रेसमधील प्रवाशांना एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून कल्याणपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेचे तिकीट दाखवून कल्याणपर्यंतचा प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती, यामुळे सुमारे सातशेपेक्षा अधिक प्रवाशांना कल्याणपर्यंत पोहचणे शक्य झाले. आसनगावनजीक दुरांतो एक्स्प्रेसला झालेला अपघात आणि त्यानंतर मुंबईत सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे मनमाड, नाशिक येथून मुंबईला जाणाºया प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नाशिकरोडला अडकलेल्या प्रवाशांना स्वखर्चाने महामंडळाच्या बसेसमधून तिकीट काढून महामार्ग बसस्थानक गाठावे लागले असले तरी इगतपुरीत अडकलेल्या प्रवाशांना कल्याणपर्यंत रेल्वेच्याच तिकिटावर बसद्वारे नेण्यात आले. रेल्वे प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून महामंडळाला प्रवासी भाडे देण्याची तयारी दर्शविल्यानंतर ज्या प्रवाशांकडे रेल्वेचे तिकीट होते त्यांना प्राधान्याने कल्याणपर्यंत बसने पोहोचविण्यात आले. या प्रवाशांचे भाडे आता रेल्वे प्रशासन देणार असल्याची माहिती महामंडळाचे अधिकारी पाटील यांनी दिली. रेल्वे प्रवाशांचे हाल पाहून रेल्वे प्रशासनाने तातडीने इगतपुरी बसस्थानक प्रमुखांशी संपर्क साधून रेल्वेच्या प्रवाशांसाठी बसेस देण्याची विनंती केली असता सुमारे १५ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना कल्याणपर्यंत सोडण्यात आले. रेल्वेचे तिकीट दाखवून प्रवाशांना एस.टी. बसमध्ये बसविले जात होते. यासाठी रेल्वे प्रशासनाचे दोन तिकीट निरीक्षक, एस.टी. महामंडळाचे दोन अधिकारी आणि रेल परिषदेचे सचिव देवीदास पंडित आणि त्यांच्या साथीदारांनी प्रवाशांना मदत करीत कल्याणपर्यंतच्या बसेस उपलब्ध करून दिल्या. बसेसमध्ये बसण्यासाठी इगतपुरी रेल्वेस्थानकाबाहेर रांगा लावण्यात आल्या होत्या. यासाठी स्थानिक नागरिक आणि रेल परिषदेच्या सदस्यांनी प्रवाशांना मदत केली. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्थादेखील स्थानिक नागरिकांनी केली होती.