शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

तिकीट रेल्वेचे; प्रवास एसटीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:44 IST

आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी झालेल्या अपघातानंतर इगतपुरी येथे थांबविण्यात आलेल्या तीनही एक्स्प्रेसमधील प्रवाशांना एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून कल्याणपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेचे तिकीट दाखवून कल्याणपर्यंतचा प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती, यामुळे सुमारे सातशेपेक्षा अधिक प्रवाशांना कल्याणपर्यंत पोहचणे शक्य झाले.

नाशिक : आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी झालेल्या अपघातानंतर इगतपुरी येथे थांबविण्यात आलेल्या तीनही एक्स्प्रेसमधील प्रवाशांना एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून कल्याणपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेचे तिकीट दाखवून कल्याणपर्यंतचा प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती, यामुळे सुमारे सातशेपेक्षा अधिक प्रवाशांना कल्याणपर्यंत पोहचणे शक्य झाले. आसनगावनजीक दुरांतो एक्स्प्रेसला झालेला अपघात आणि त्यानंतर मुंबईत सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे मनमाड, नाशिक येथून मुंबईला जाणाºया प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नाशिकरोडला अडकलेल्या प्रवाशांना स्वखर्चाने महामंडळाच्या बसेसमधून तिकीट काढून महामार्ग बसस्थानक गाठावे लागले असले तरी इगतपुरीत अडकलेल्या प्रवाशांना कल्याणपर्यंत रेल्वेच्याच तिकिटावर बसद्वारे नेण्यात आले. रेल्वे प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून महामंडळाला प्रवासी भाडे देण्याची तयारी दर्शविल्यानंतर ज्या प्रवाशांकडे रेल्वेचे तिकीट होते त्यांना प्राधान्याने कल्याणपर्यंत बसने पोहोचविण्यात आले. या प्रवाशांचे भाडे आता रेल्वे प्रशासन देणार असल्याची माहिती महामंडळाचे अधिकारी पाटील यांनी दिली. रेल्वे प्रवाशांचे हाल पाहून रेल्वे प्रशासनाने तातडीने इगतपुरी बसस्थानक प्रमुखांशी संपर्क साधून रेल्वेच्या प्रवाशांसाठी बसेस देण्याची विनंती केली असता सुमारे १५ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना कल्याणपर्यंत सोडण्यात आले. रेल्वेचे तिकीट दाखवून प्रवाशांना एस.टी. बसमध्ये बसविले जात होते. यासाठी रेल्वे प्रशासनाचे दोन तिकीट निरीक्षक, एस.टी. महामंडळाचे दोन अधिकारी आणि रेल परिषदेचे सचिव देवीदास पंडित आणि त्यांच्या साथीदारांनी प्रवाशांना मदत करीत कल्याणपर्यंतच्या बसेस उपलब्ध करून दिल्या. बसेसमध्ये बसण्यासाठी इगतपुरी रेल्वेस्थानकाबाहेर रांगा लावण्यात आल्या होत्या. यासाठी स्थानिक नागरिक आणि रेल परिषदेच्या सदस्यांनी प्रवाशांना मदत केली. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्थादेखील स्थानिक नागरिकांनी केली होती.