शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

९० हजार भाविकांची बसने त्र्यंबकवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:26 IST

वण महिन्यातील तिसऱ्या सोमवारचे धार्मिक महत्त्व मानले जात असल्यामुळे दरवर्षी तिसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाणाºया भाविकांची संख्या मोठी असते. जिल्ह्यातून तसेच परराज्यातून या दिवशी भाविक नाशिकमध्ये दाखल होत असल्यामुळे त्यांच्यासाठी महामंडळाकडून ३०० बसेसचे नियोजन करण्यात आले होते.

नाशिक : श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारचे धार्मिक महत्त्व मानले जात असल्यामुळे दरवर्षी तिसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाणाºया भाविकांची संख्या मोठी असते. जिल्ह्यातून तसेच परराज्यातून या दिवशी भाविक नाशिकमध्ये दाखल होत असल्यामुळे त्यांच्यासाठी महामंडळाकडून ३०० बसेसचे नियोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १८ ते सोमवार, दि. १९ रात्री ८ वाजेपर्यंत प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून सुमारे ९० हजार भाविकांनी बसने प्रवास केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.श्रावण महिन्यातील तिसºया सोमवारी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी रविवारी सकाळपासूनच महामंडळाने ३०० बसेसचे नियोजन केले होते. शहरातील ईदगाह मैदान येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या बसस्थानकातून त्र्यंबकेश्वरकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याबरोबर शहरातील नाशिकरोड, भगूर, पंचवटी, सातपूर येथील स्थानकांमधूनदेखील बसेस सोडण्यात आल्यामुळे ईदगाह मैदानावरील ताण काही प्रमाणात कमी झाला. रविवारी दुपारनंतर ईदगाह मैदान येथून सोडण्यात आलेल्या बसेस सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होत्या. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे ९० हजार भाविकांनी बसने प्रवास केल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.रविवारी सायंकाळी भाविकांचा ओघ सुरू झाला आणि रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांची स्थानकावर गर्दी होत होती. त्र्यंबकेश्वरला थेट बस जात असल्याने भाविकांनीदेखील बसनेच जाण्याला प्राधान्य दिले. रविवारी पहाटेपर्यंत ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातल्यानंतर सोमवारी पहाटेपासून भाविकांना परतीचे वेध लागले होते. परतीसाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने ईदगाह मैदानाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.यंदा प्रवासी घटलेदरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वरला जाणाºया भाविकांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. साधारणपणे दुसºया आणि तिसºया सोमवारी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाण्यासाठी प्राधान्य दिले जाते. यंदा मात्र प्रवासी संख्या कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरवर्षी साधारणपणे एक लाखाच्या पुढे भाविक नाशिकमधून त्र्यंबकेश्वरकडे जातात. परंतु फक्त ईदगाह स्थानकातून २० ते २५ हजार भाविकांनी प्रवास केला.सलग सुट्यांमुळे प्रवासी कमीदरवर्षी होणाºया गर्दीचा उच्चांक लक्षात घेता यंदा तुलनेत भाविकांची संख्या कमीच होती. सलग आलेल्या शासकीय सुट्यांमुळे भाविकांनी सुट्यांमध्येच दर्शन घेतल्याचे बोलले जाते तर काही भाविक तीन ते चार दिवसांपासूनच मुक्कामी होते. त्यामुळेदेखील बसने प्रवास करणाºया भाविकांनी संख्या कमीच होती. रविवार सायंकाळपर्यंत साधारणपणे ३० हजार, तर दुसºया दिवशीदेखील १७ हजार भाविकांनी प्रवास केला. तर तितक्याच संख्येने भाविकांनी परतीचा प्रवास केला. ही आकडेवारी केवळ ईदगाह मैदान येथील स्थानकातून असून अन्य स्थानकातूनदेखील भाविकांनी त्र्यंबकेश्वरच्या बसने प्रवास केला. या सर्व स्थानकामंधून जवळपास लाखभर भाविक त्र्यंबककडे रवाना झाले.सलग दोन दिवस नाशिकमधून मोठ्या प्रमाणात भाविकांची वाहतूक करण्यात आली. या कालावधीत कुठेही भाविकांना गर्दीचा त्रास झाला नाही शिवाय भाविकांनी शक्यतो बसूनच प्रवास करावा यासाठी दर पाच मिनिटांनी बस उपलब्ध करून दिली जात होती. विभाग नियंत्रक नितीन मंैद आणि विभागीय वाहतूक अधिकारी उत्तम पाटील यांनी केलेल्या नियोजनानुसार नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी काटेकोर सेवा बजावली.- व्ही. व्ही. निकम, सहायक वाहतूक अधिकारी.

टॅग्स :state transportएसटीtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर