शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

सिन्नर तालुक्यातील तीन पाणी योजनांची जोडणी कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : तालुक्यातील तीन पाणी योजनांची सुमारे एक कोटी रुपये वीज थकबाकी असल्याने वावीसह ११ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सिन्नर : तालुक्यातील तीन पाणी योजनांची सुमारे एक कोटी रुपये वीज थकबाकी असल्याने वावीसह ११ गावे, मनेगावसह १६ गावे, बारागाविपंप्रीसह ७ गावांच्या पाणी योजनेची वीज जोडणी महावितरणकडून कापण्यात आली. महावितरणने ही कारवाई केल्यामुळे या गावांमधील पाणीयोजना ठप्प झाल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात या गावांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ या तीनही योजनांवर अवलंबून असलेल्या गावातील ग्रामस्थांवर आली आहे.

महावितरणने या अगोदरही वीज देयक भरण्याबाबत योजनेच्या समिती पदाधिकाऱ्यांना कळवले होते. तथापि, ही बाब गांभीर्याने घेतली गेली नाही. अखेर महावितरणने एक कोटी रूपयांपेक्षा जास्त थकबाकी झाल्याने तीनही योजनांची वीज जोडणी कापली. वीज जोडणी तोडल्याने या गावातील पाणीयोजना ठप्प झाल्या आहेत.

वावीसह ११ गावे योजनेची सर्वाधिक ६५ लाख रुपये थकबाकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणे आता अवघड होऊन बसले आहे. मनेगावसह १६ गावे योजनेची २० लाख रुपये थकबाकी आहे तर बारागाविपंप्रीसह ७ गावांच्या योजनेची १८ लाख रुपये थकबाकी आहे. पाणी योजना अजून हस्तांतरित झाली नसल्याने या योजनेचे देयक कोण भरणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

-------------------

योजना सचिवांची तातडीची बैठक

गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी योजनेच्या सचिवांची तातडीने बैठक घेतली. योजनेनिहाय झालेल्या बैठकीत थकीत वीज देयक, उपलब्ध निधी यावर चर्चा झाली. वीज जोडणीसाठी आवश्यक असलेला निधी दोन दिवसात उभा करण्याच्या सूचना योजना सचिवांसह समाविष्ट गावांमधील ग्रामसेवकांना देण्यात आल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता नितीन पाटील या बैठकीला उपस्थित होते. तीन दिवसांपासून योजनांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. तीनही योजनांमध्ये ३४ गावांचा समावेश होतो. पाणीपुरवठा बंद असल्याने १ लाख ५० हजार ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

--------------

योजनांमध्ये त्रुटी

बारागाविपंप्रीसह सात गावे पाणीपुरवठा योजना अजून हस्तांतरित झालेली नाही. या योजनेत अजूनही काही त्रुटी आहेत. पुरेशा क्षमतेने पाणी येत नसल्याची ओरड काही गावांमधून होत आहे. अशास्थितीत संबंधित गावांतून वीज देयकासाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी आहेत तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे कोणताही निधी नसल्याचे उपअभियंता पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले. गटविकास अधिकाऱ्यांनी देयकाची जबाबदारी योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदारावर ढकलली आहे. अशास्थितीत या योजनेच्या वीज देयकाचा तिढा कायम आहे.