शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सिन्नर तालुक्यातील तीन पाणी योजनांची जोडणी कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : तालुक्यातील तीन पाणी योजनांची सुमारे एक कोटी रुपये वीज थकबाकी असल्याने वावीसह ११ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सिन्नर : तालुक्यातील तीन पाणी योजनांची सुमारे एक कोटी रुपये वीज थकबाकी असल्याने वावीसह ११ गावे, मनेगावसह १६ गावे, बारागाविपंप्रीसह ७ गावांच्या पाणी योजनेची वीज जोडणी महावितरणकडून कापण्यात आली. महावितरणने ही कारवाई केल्यामुळे या गावांमधील पाणीयोजना ठप्प झाल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात या गावांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ या तीनही योजनांवर अवलंबून असलेल्या गावातील ग्रामस्थांवर आली आहे.

महावितरणने या अगोदरही वीज देयक भरण्याबाबत योजनेच्या समिती पदाधिकाऱ्यांना कळवले होते. तथापि, ही बाब गांभीर्याने घेतली गेली नाही. अखेर महावितरणने एक कोटी रूपयांपेक्षा जास्त थकबाकी झाल्याने तीनही योजनांची वीज जोडणी कापली. वीज जोडणी तोडल्याने या गावातील पाणीयोजना ठप्प झाल्या आहेत.

वावीसह ११ गावे योजनेची सर्वाधिक ६५ लाख रुपये थकबाकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणे आता अवघड होऊन बसले आहे. मनेगावसह १६ गावे योजनेची २० लाख रुपये थकबाकी आहे तर बारागाविपंप्रीसह ७ गावांच्या योजनेची १८ लाख रुपये थकबाकी आहे. पाणी योजना अजून हस्तांतरित झाली नसल्याने या योजनेचे देयक कोण भरणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

-------------------

योजना सचिवांची तातडीची बैठक

गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी योजनेच्या सचिवांची तातडीने बैठक घेतली. योजनेनिहाय झालेल्या बैठकीत थकीत वीज देयक, उपलब्ध निधी यावर चर्चा झाली. वीज जोडणीसाठी आवश्यक असलेला निधी दोन दिवसात उभा करण्याच्या सूचना योजना सचिवांसह समाविष्ट गावांमधील ग्रामसेवकांना देण्यात आल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता नितीन पाटील या बैठकीला उपस्थित होते. तीन दिवसांपासून योजनांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. तीनही योजनांमध्ये ३४ गावांचा समावेश होतो. पाणीपुरवठा बंद असल्याने १ लाख ५० हजार ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

--------------

योजनांमध्ये त्रुटी

बारागाविपंप्रीसह सात गावे पाणीपुरवठा योजना अजून हस्तांतरित झालेली नाही. या योजनेत अजूनही काही त्रुटी आहेत. पुरेशा क्षमतेने पाणी येत नसल्याची ओरड काही गावांमधून होत आहे. अशास्थितीत संबंधित गावांतून वीज देयकासाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी आहेत तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे कोणताही निधी नसल्याचे उपअभियंता पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले. गटविकास अधिकाऱ्यांनी देयकाची जबाबदारी योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदारावर ढकलली आहे. अशास्थितीत या योजनेच्या वीज देयकाचा तिढा कायम आहे.