शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

सिन्नर तालुक्यातील तीन पाणी योजनांची जोडणी कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : तालुक्यातील तीन पाणी योजनांची सुमारे एक कोटी रुपये वीज थकबाकी असल्याने वावीसह ११ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सिन्नर : तालुक्यातील तीन पाणी योजनांची सुमारे एक कोटी रुपये वीज थकबाकी असल्याने वावीसह ११ गावे, मनेगावसह १६ गावे, बारागाविपंप्रीसह ७ गावांच्या पाणी योजनेची वीज जोडणी महावितरणकडून कापण्यात आली. महावितरणने ही कारवाई केल्यामुळे या गावांमधील पाणीयोजना ठप्प झाल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात या गावांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ या तीनही योजनांवर अवलंबून असलेल्या गावातील ग्रामस्थांवर आली आहे.

महावितरणने या अगोदरही वीज देयक भरण्याबाबत योजनेच्या समिती पदाधिकाऱ्यांना कळवले होते. तथापि, ही बाब गांभीर्याने घेतली गेली नाही. अखेर महावितरणने एक कोटी रूपयांपेक्षा जास्त थकबाकी झाल्याने तीनही योजनांची वीज जोडणी कापली. वीज जोडणी तोडल्याने या गावातील पाणीयोजना ठप्प झाल्या आहेत.

वावीसह ११ गावे योजनेची सर्वाधिक ६५ लाख रुपये थकबाकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणे आता अवघड होऊन बसले आहे. मनेगावसह १६ गावे योजनेची २० लाख रुपये थकबाकी आहे तर बारागाविपंप्रीसह ७ गावांच्या योजनेची १८ लाख रुपये थकबाकी आहे. पाणी योजना अजून हस्तांतरित झाली नसल्याने या योजनेचे देयक कोण भरणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

-------------------

योजना सचिवांची तातडीची बैठक

गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी योजनेच्या सचिवांची तातडीने बैठक घेतली. योजनेनिहाय झालेल्या बैठकीत थकीत वीज देयक, उपलब्ध निधी यावर चर्चा झाली. वीज जोडणीसाठी आवश्यक असलेला निधी दोन दिवसात उभा करण्याच्या सूचना योजना सचिवांसह समाविष्ट गावांमधील ग्रामसेवकांना देण्यात आल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता नितीन पाटील या बैठकीला उपस्थित होते. तीन दिवसांपासून योजनांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. तीनही योजनांमध्ये ३४ गावांचा समावेश होतो. पाणीपुरवठा बंद असल्याने १ लाख ५० हजार ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

--------------

योजनांमध्ये त्रुटी

बारागाविपंप्रीसह सात गावे पाणीपुरवठा योजना अजून हस्तांतरित झालेली नाही. या योजनेत अजूनही काही त्रुटी आहेत. पुरेशा क्षमतेने पाणी येत नसल्याची ओरड काही गावांमधून होत आहे. अशास्थितीत संबंधित गावांतून वीज देयकासाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी आहेत तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे कोणताही निधी नसल्याचे उपअभियंता पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले. गटविकास अधिकाऱ्यांनी देयकाची जबाबदारी योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदारावर ढकलली आहे. अशास्थितीत या योजनेच्या वीज देयकाचा तिढा कायम आहे.