शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार सदस्यांवर अपात्रतेचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:38 IST

राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निवडल्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करणाºया आयोगाच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्याने ज्यांनी पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्णातील ३०३२ ग्रामपंचायत सदस्याबरोबरच जिल्हा परिषदेचे तीन व पंचायत समित्यांचे दहा सदस्यांची पदे धोक्यात आली आहेत.

नाशिक : राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निवडल्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करणाºया आयोगाच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्याने ज्यांनी पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्णातील ३०३२ ग्रामपंचायत सदस्याबरोबरच जिल्हा परिषदेचे तीन व पंचायत समित्यांचे दहा सदस्यांची पदे धोक्यात आली आहेत.आयोगाने काढलेल्या आदेशात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºयांची पदे रद्द करण्याच्या निर्णयाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करण्याचे म्हटले असल्यामुळे सन २०१६पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचीमाहिती गोळा करण्याचे काम प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. त्यात नाशिक जिल्ह्णातील नगरपंचायतींच्या नऊ सदस्यांचा समावेश असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अनुक्रमे तीन व दहा सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. ग्रामपंचायत सदस्यांना मात्र आयोगाच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. जिल्ह्णात १३८० ग्रामपंचायती असून,राखीव जागेवर नामांकन भरतानाच उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अथवा ते छाननी समितीकडे पाठविल्याची पावती जोडण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे. निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सदस्याने जात वैधता समितीकडून पडताळणी प्रमाणपत्र घेऊन ते संबंधितांना सादर करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद निवडणूक कायद्यात करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातून माहिती मागविली असून, प्राथमिक पातळीवर जिल्ह्णात ३०३२ ग्रामपंचायत सदस्यांनी आपले जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे आढळून आले आहे. येत्या काही दिवसांत त्यांना नोटिसा बजावून खुलासा मागविण्यात येणार आहे, त्यानंतर अपात्र करण्याची कार्यवाही सुरू होईल.८६३३ राखीव जागाजिल्ह्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये ८६३३ जागा राखीव गटासाठी आरक्षित असून, त्यातील ४१६७ सदस्यांनी नामांकन सादर करतानाच वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर केले होते. तर निवडून आल्यानंतर ४४६६ सदस्यांनी प्रमाणपत्र दिले. निवडणूक आयोगाच्या सहा महिन्याच्या मुदतीत १४२७ सदस्यांनी प्रमाणपत्र दिले तर सहा महिने उलटूनही ३०३२ सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केलेले नाही.

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायत