शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

तीन हजार सदस्यांवर अपात्रतेचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:38 IST

राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निवडल्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करणाºया आयोगाच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्याने ज्यांनी पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्णातील ३०३२ ग्रामपंचायत सदस्याबरोबरच जिल्हा परिषदेचे तीन व पंचायत समित्यांचे दहा सदस्यांची पदे धोक्यात आली आहेत.

नाशिक : राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निवडल्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करणाºया आयोगाच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्याने ज्यांनी पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्णातील ३०३२ ग्रामपंचायत सदस्याबरोबरच जिल्हा परिषदेचे तीन व पंचायत समित्यांचे दहा सदस्यांची पदे धोक्यात आली आहेत.आयोगाने काढलेल्या आदेशात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºयांची पदे रद्द करण्याच्या निर्णयाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करण्याचे म्हटले असल्यामुळे सन २०१६पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचीमाहिती गोळा करण्याचे काम प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. त्यात नाशिक जिल्ह्णातील नगरपंचायतींच्या नऊ सदस्यांचा समावेश असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अनुक्रमे तीन व दहा सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. ग्रामपंचायत सदस्यांना मात्र आयोगाच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. जिल्ह्णात १३८० ग्रामपंचायती असून,राखीव जागेवर नामांकन भरतानाच उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अथवा ते छाननी समितीकडे पाठविल्याची पावती जोडण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे. निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सदस्याने जात वैधता समितीकडून पडताळणी प्रमाणपत्र घेऊन ते संबंधितांना सादर करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद निवडणूक कायद्यात करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातून माहिती मागविली असून, प्राथमिक पातळीवर जिल्ह्णात ३०३२ ग्रामपंचायत सदस्यांनी आपले जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे आढळून आले आहे. येत्या काही दिवसांत त्यांना नोटिसा बजावून खुलासा मागविण्यात येणार आहे, त्यानंतर अपात्र करण्याची कार्यवाही सुरू होईल.८६३३ राखीव जागाजिल्ह्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये ८६३३ जागा राखीव गटासाठी आरक्षित असून, त्यातील ४१६७ सदस्यांनी नामांकन सादर करतानाच वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर केले होते. तर निवडून आल्यानंतर ४४६६ सदस्यांनी प्रमाणपत्र दिले. निवडणूक आयोगाच्या सहा महिन्याच्या मुदतीत १४२७ सदस्यांनी प्रमाणपत्र दिले तर सहा महिने उलटूनही ३०३२ सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केलेले नाही.

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायत