शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार चालक वाहकांचा रोजच एक लाख प्रवाशांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:15 IST

नाशिक: अनलॉकच्या प्रक्रियेनंतर टप्प्याटप्प्याने प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने ड्युटीवर असलेल्या चालक वाहकांचा रोजच प्रवाशांशी संपर्क येतो. रोजच्या प्रवासात अनेक ...

नाशिक: अनलॉकच्या प्रक्रियेनंतर टप्प्याटप्प्याने प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने ड्युटीवर असलेल्या चालक वाहकांचा रोजच प्रवाशांशी संपर्क येतो. रोजच्या प्रवासात अनेक गावे आणि प्रवाशांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना सर्वाधिक धोका पत्करून सेवा बजवावी लागते. आता पुन्हा कोरेानाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे चालक वाहकांचा धोका देखील वाढला आहे. महामंडळाकडून सुरक्षिततेची कोणतीही साधने पुरविली जात नसल्याने त्यांना स्वत:च स्वत:ची काळजी घ्यावी लागत आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका हा महामंडळाला आणि त्यातील चालक वाहकांना बसला आहे. एस.टी. महामंडळातील चालक वाहकांची संख्या अधिक असल्याने फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या या चालक वाहकांना सर्वाधिक फटका बसला आहे. कोरेानाच्या काळात बसेस बंद असतांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू झालेल्या काही बसेससाठी त्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागले. परप्रांतीय प्रवासी वाहतूक करण्यासाठी त्यांना याच काळात मोठी जबाबदारी पार पाडावी लागली. यातून अनेक चालक वाहकांना कोरोनाची देखील लागण झाली.

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात सुमारे चार हजार चालक आणि वाहकांची संख्या आहे. त्यापैकी सुमारे ४० टक्के कर्मचारी अनेकविध कारणांनी रजेवर राहतात. काही चालक हे मुंबईत बेस्टच्या सेवेला मदत करीत आहेत. जिल्ह्यात सुमारे तीन हजार चालक वाहकांना दररोज लाखो प्रवाशांच्या संपर्कात यावे लागते. जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून दररोज एक ते सव्वालाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यांचा संपर्क जिल्ह्यातील तेरा डेपोमंधील चालक वाहकांशी येतो.

--इन्फो--

२१०० चालक

१९०० वाहक

--- रोजच्या फेऱ्या

--इन्फेा--

१ लाख १५ हजार प्रवाशांचा रोजचा प्रवास

जिल्ह्यातील १३ डेपोमधून ६६७ बसेसच्या माध्यमातून सुरू असलेल्या बसेसमधून दररोज सुमारे १ लाख १५ हजार इतके प्रवासी प्रवास करतात. सुटीच्या दिवशी तर प्रवासी संख्या १ लाख ४० हजारापर्यंत देखील पोहचली आहे. नाशिमधून जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर होणाऱ्या प्रवासी वाहतुकीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. प्रवासी आपली काळजी घेत आहेच, चालक वाहकांना देखील स्वता:ची काळजी घ्यावी लागत आहे. दररोजच्या प्रवासात चालक वाहकांचा दररोज हजारो लोकांशी संपर्क येतो.

--इन्फो--

तपासणी होतच नाही

दररोज प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या चालक वाहकांची राज्य परिहवन महामंडळाकडून कोणतीही तपासणी केली जात नाही. किंबहूना मुंबईत सेवा बजावून आलेल्या चालकवाहकांची देखील कोणतीही तपासणी केली जात नाही. परजिल्ह्यातून आलेल्या चालकांना जिल्ह्यातील ड्युटी लागलीच दिली जाते. आवश्यकता किंवा शंका वाटली तर त्या संबंधित चालक वाहकांनी स्वत:ची तपासणी करवून घ्यावी असे महामंडळाकडून सांगण्यात आलेले आहे.

--इन्फो--

लसीकरण होणार कधी?

दररोज प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या आणि फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या एस.टी. चालक वाहकांना लसबाबतचा कोणताही विषय आजवर झालेला नाही. कर्मचाऱ्यांची लस देण्यात यावी अशी मागणी आहे परंतु अधिकृतरीत्या मागणीचे निवेदन देण्यात आलेले नाही. एस.टी. कर्मचाऱ्यांचा अजूनही विचार झालेलला नाही. त्यामुळे त्यांना लसीचे संरक्षण अद्याप मिळालेले नाही.

--इन्फो--

मास्क, सॅनिटायझर नसल्याचे गैरसोय

चालकांना एकदा मास्क, सॅनिटायझर पुरविले जात नसल्याने चालक वाहकांना स्वत:च व्यवस्था करावी लागते. काही चालक मास्क वापरताता, काही आजिबात वापरत नाही तर काही केवळ तोंडाला रूमाल बांधतात. वाहकांना प्रवाशांचे तिकीट काढतांना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे वाहक मास्क वापरतांना दिसतात.

--कोट--

दररोज प्रवाशांच्या संपर्कात येत असल्याने धोका असतोच परंतु ड्युटी करण्याशिवाय पर्याय नाही. स्वत:ची काळजी घेऊन ड्युटी करावी लागते. कधी खूप प्रवासी असतात तर कधी फारसा प्रतिसाद नसतो. सुटीच्या दिवशी प्रवासी संख्या वाढलेली असते. त्यांच्यात राहूनच काम करावे लागते. एस.टी. सुरळीत सुरू राहिली पाहिजे, आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी ड्युटी करावीच लागणार आहे.

- धनंजय राऊत , वाहक

--कोट--

चालकाचा संबंध थेट प्रवाशांशी येत नसला तरी प्रवासी घेऊन जातांना प्रत्यक्ष संपर्क येतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा, तसेच स्थानकातून येजा करण्याचा धोका पत्करून काम करावे लागते. प्रत्येक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात रूग्ण आहेत, परिस्थिती वेगळी असते. कधी कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही. धोका ओळखून काम करावे लागते.

- आनंद कुराडे, चालक

- इन्फो--

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर हळूहळू बसेस मार्गावर आलेल्या आहेत. प्रवाशांची संख्या वाढत असतांनाच आता पुन्हा केरोनाचे संकट उभे राहिले आहे. सध्या मिळणाऱ्या उतपन्नातून किमान विभागाचा खर्च भागविला जात आहे. उत्पन्न कमी झाले तर काही बसेस पुन्हा कमी करण्याची शक्यता आहे. शासनाने दिलेल्या अनुदानातून एप्रिल पर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन होऊ शकेल. मात्र परिस्थिती सुधारली नाही तर संकट अधिक वाढू शकते. त्यामुळे अनिश्चितेची टांगती तलवार कायम आहे.