शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

लूटमारीचे तीन तेरा, तरीही अभ्यासाला सातारा

By admin | Updated: October 6, 2015 23:27 IST

जिल्हा बॅँक : संचालक मंडळाची भूमिका वादात

नाशिक : गेल्या तीन-चार महिन्यांत डझनवारी लूटमारीच्या घडलेल्या घटना, पाठोपाठ उठलेले सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीचे काहूर, या सर्वांवर कळस म्हणजे सर्वसाधारण सभेत चक्क काही संस्थांच्या कर्जमाफीचे ठराव आणि दुसरीकडे शंभर टक्के कर्ज वसुलीसाठी नियोजित सातारा अभ्यास दौरा.. या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ग्रामीण भागातील शाखांमध्ये एका पाठोपाठ एक रोख रक्कमेची लूटमार आणि सोने-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटनांत दिवसागणिक वाढ होत आहे. कालही (दि.६) येवला तालुक्यातील जळगाव नेऊर शाखेत चोरीची घटना घडली. चोऱ्या रोखण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सर्व २१३ शाखांमध्ये चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाचे एकमत झाले असले तरी, अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. उलट ही खरेदीची प्रक्रियाच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्या विरोधात काही ठेकेदार मंडळी न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत सातारा येथील सहकारी संस्था सचिवांच्या सेवा जिल्हा बॅँकेच्या कक्षेत आणल्याने तेथे शंभर टक्के वसुली होत असल्याचे सांगत येत्या १३ व १४ आॅक्टोबर रोजी जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाने सातारा येथे अभ्यास दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यास दौऱ्याचे प्रयोजनाचा उद्देश जरी चांगला असला तरी प्रत्यक्षात जिल्हा बॅँकेच्या ग्रामीण भागातील शाखांमध्ये दिवसागणिक चोऱ्या आणि लूटमारीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत असतानाच आणि त्यातील संशयित दरोडेखोरही सापडत नसताना त्यावर तत्काळ प्रभावीपणे उपाययोजना करण्याऐवजी संचालक मंडळ अभ्यास दौऱ्याच्या तयारीत मश्गुल असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक पाहता रानवड येथील शाखेत चक्क लॉकर फोडून कोट्यवधी रुपयांची सोने चोरी होण्याच्या घटनेनंतर जेथे जेथे रोकड व सोने ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा आहे, तेथे रात्रपाळीसाठी तत्काळ एका शिपायाची नेमणूक करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात रात्रपाळीसाठी शिपायांची नेमणूक झाली काय? याबाबत चर्चा आहे. खासगी बॅँकांमध्ये तुलनेने चोऱ्या कमी होत असताना प्रत्यक्षात फक्त जिल्हा बॅँकांच्याच शाखांमध्ये चोऱ्या का होत आहेत? याबाबत जिल्हा बॅँकेच्या वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.(प्रतिनिधी)