शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
3
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
4
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
5
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
6
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
7
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
8
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
9
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
10
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
11
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
12
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
13
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
14
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
15
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
16
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
17
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
18
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
19
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
20
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?

विषारी औषध सेवन करून जिल्ह्यात तिघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:42 IST

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर, हरसूल व दिंडोरी तालुक्यातील तिघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून, या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

ठळक मुद्दे दोन वर्षांपूर्वी एक लाख चाळीस हजार रु पये पीक कर्ज घेतले होते.

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर, हरसूल व दिंडोरी तालुक्यातील तिघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून, या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील सतरा वर्षीय रेखा भगवान आंबोरे या तरुणीने मंगळवारी (दि़९) सकाळी उंदीर मारण्याचे औषध सेवन केले़ ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिचा भाऊ गौतम आंबोरे याने तत्काळ बिटको व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी (दि़१०) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या घटनेची सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़हरसूल तालुक्यातील खोडची वाडी येथील विवाहिता चित्रा संजय खाडे (२६) हिने बुधवारी (दि़१०) सकाळी विषारी औषध सेवन केले़ ही बाब लक्षात येताच तिचे पती संजय खाडे यांनी गिरणारे येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता दुपारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला़ या घटनेची हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील वैभव विष्णू वाघ (२३) या तरुणाने मंगळवारी (दि़९) सकाळी विषारी औषध सेवन केले़ त्यास वडील विष्णू वाघ यांनी तत्काळ दिंडोरी व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता बुधवारी उपचारादरम्यान त्याचामृत्यू झाला़ या घटनेची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़जवळकी येथील शेतकऱ्याची आत्महत्या नांदगाव : तालुक्यातील जवळकी येथील तरु ण शेतकरी काशीनाथ श्रावण गायकवाड (५०) यांनी सततच्या नापिकीला कंटाळून मंगळवारी (दि.९) सकाळी ११ वाजता कपाशी पिकावर फवारणी करण्यासाठी आणलेले विषारी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांचे बंधू प्रकाश यांनी दिली. काशीनाथ गायकवाड यांना तातडीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारीडॉ. उस्मान घोडके यांनी प्रथमोपचार करून औरंगाबाद येथील शासकीय घाटी रु ग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविले होते. तेथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुले, दोन भाऊ, सहा पुतणे, दोन बहिणी असा परिवार आहे.काशीनाथ यांनी वडील श्रावण चिंधा गायकवाड यांच्या नावावर असलेली शेतजमीन गट नंबर ५०८/२ क्षेत्र ४ हेक्टर १८ गुंठे या जमिनीवर बोलठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडून दोन वर्षांपूर्वी एक लाख चाळीस हजार रु पये पीक कर्ज घेतले होते. त्याचे व्याज ३२,७०० रु पये कालपर्यंत झाले होते. त्यांनी वडिलांच्या नावावर घेतलेले कर्ज कर्ज माफी योजनेअंतर्गत माफ झालेले नसल्याची माहिती सोसायटीचे सचिव कैलास कर्ने यांनी दिली. त्यांचा लहानभाऊ कैलास लहानपणापासून अपंग आहे.