शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

विषारी औषध सेवन करून जिल्ह्यात तिघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:42 IST

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर, हरसूल व दिंडोरी तालुक्यातील तिघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून, या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

ठळक मुद्दे दोन वर्षांपूर्वी एक लाख चाळीस हजार रु पये पीक कर्ज घेतले होते.

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर, हरसूल व दिंडोरी तालुक्यातील तिघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून, या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील सतरा वर्षीय रेखा भगवान आंबोरे या तरुणीने मंगळवारी (दि़९) सकाळी उंदीर मारण्याचे औषध सेवन केले़ ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिचा भाऊ गौतम आंबोरे याने तत्काळ बिटको व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी (दि़१०) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या घटनेची सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़हरसूल तालुक्यातील खोडची वाडी येथील विवाहिता चित्रा संजय खाडे (२६) हिने बुधवारी (दि़१०) सकाळी विषारी औषध सेवन केले़ ही बाब लक्षात येताच तिचे पती संजय खाडे यांनी गिरणारे येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता दुपारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला़ या घटनेची हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील वैभव विष्णू वाघ (२३) या तरुणाने मंगळवारी (दि़९) सकाळी विषारी औषध सेवन केले़ त्यास वडील विष्णू वाघ यांनी तत्काळ दिंडोरी व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता बुधवारी उपचारादरम्यान त्याचामृत्यू झाला़ या घटनेची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़जवळकी येथील शेतकऱ्याची आत्महत्या नांदगाव : तालुक्यातील जवळकी येथील तरु ण शेतकरी काशीनाथ श्रावण गायकवाड (५०) यांनी सततच्या नापिकीला कंटाळून मंगळवारी (दि.९) सकाळी ११ वाजता कपाशी पिकावर फवारणी करण्यासाठी आणलेले विषारी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांचे बंधू प्रकाश यांनी दिली. काशीनाथ गायकवाड यांना तातडीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारीडॉ. उस्मान घोडके यांनी प्रथमोपचार करून औरंगाबाद येथील शासकीय घाटी रु ग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविले होते. तेथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुले, दोन भाऊ, सहा पुतणे, दोन बहिणी असा परिवार आहे.काशीनाथ यांनी वडील श्रावण चिंधा गायकवाड यांच्या नावावर असलेली शेतजमीन गट नंबर ५०८/२ क्षेत्र ४ हेक्टर १८ गुंठे या जमिनीवर बोलठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडून दोन वर्षांपूर्वी एक लाख चाळीस हजार रु पये पीक कर्ज घेतले होते. त्याचे व्याज ३२,७०० रु पये कालपर्यंत झाले होते. त्यांनी वडिलांच्या नावावर घेतलेले कर्ज कर्ज माफी योजनेअंतर्गत माफ झालेले नसल्याची माहिती सोसायटीचे सचिव कैलास कर्ने यांनी दिली. त्यांचा लहानभाऊ कैलास लहानपणापासून अपंग आहे.