शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

विषारी औषध सेवन करून जिल्ह्यात तिघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:42 IST

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर, हरसूल व दिंडोरी तालुक्यातील तिघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून, या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

ठळक मुद्दे दोन वर्षांपूर्वी एक लाख चाळीस हजार रु पये पीक कर्ज घेतले होते.

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर, हरसूल व दिंडोरी तालुक्यातील तिघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून, या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील सतरा वर्षीय रेखा भगवान आंबोरे या तरुणीने मंगळवारी (दि़९) सकाळी उंदीर मारण्याचे औषध सेवन केले़ ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिचा भाऊ गौतम आंबोरे याने तत्काळ बिटको व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी (दि़१०) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या घटनेची सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़हरसूल तालुक्यातील खोडची वाडी येथील विवाहिता चित्रा संजय खाडे (२६) हिने बुधवारी (दि़१०) सकाळी विषारी औषध सेवन केले़ ही बाब लक्षात येताच तिचे पती संजय खाडे यांनी गिरणारे येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता दुपारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला़ या घटनेची हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील वैभव विष्णू वाघ (२३) या तरुणाने मंगळवारी (दि़९) सकाळी विषारी औषध सेवन केले़ त्यास वडील विष्णू वाघ यांनी तत्काळ दिंडोरी व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता बुधवारी उपचारादरम्यान त्याचामृत्यू झाला़ या घटनेची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़जवळकी येथील शेतकऱ्याची आत्महत्या नांदगाव : तालुक्यातील जवळकी येथील तरु ण शेतकरी काशीनाथ श्रावण गायकवाड (५०) यांनी सततच्या नापिकीला कंटाळून मंगळवारी (दि.९) सकाळी ११ वाजता कपाशी पिकावर फवारणी करण्यासाठी आणलेले विषारी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांचे बंधू प्रकाश यांनी दिली. काशीनाथ गायकवाड यांना तातडीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारीडॉ. उस्मान घोडके यांनी प्रथमोपचार करून औरंगाबाद येथील शासकीय घाटी रु ग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविले होते. तेथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुले, दोन भाऊ, सहा पुतणे, दोन बहिणी असा परिवार आहे.काशीनाथ यांनी वडील श्रावण चिंधा गायकवाड यांच्या नावावर असलेली शेतजमीन गट नंबर ५०८/२ क्षेत्र ४ हेक्टर १८ गुंठे या जमिनीवर बोलठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडून दोन वर्षांपूर्वी एक लाख चाळीस हजार रु पये पीक कर्ज घेतले होते. त्याचे व्याज ३२,७०० रु पये कालपर्यंत झाले होते. त्यांनी वडिलांच्या नावावर घेतलेले कर्ज कर्ज माफी योजनेअंतर्गत माफ झालेले नसल्याची माहिती सोसायटीचे सचिव कैलास कर्ने यांनी दिली. त्यांचा लहानभाऊ कैलास लहानपणापासून अपंग आहे.