शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

जिल्ह्यातील तीन तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:01 IST

सटाणा : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत राज्य निकष समितीने जिल्ह्यातील तीन गावांतील तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात बागलाण तालुक्यातील जायखेडा गावाचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना ‘ब’वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे या गावांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

ठळक मुद्देसिन्नर, डुबेरेचा समावेशवारकºयांची पंढरी जायखेड्याचा होणार विकास

सटाणा : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत राज्य निकष समितीने जिल्ह्यातील तीन गावांतील तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात बागलाण तालुक्यातील जायखेडा गावाचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना ‘ब’वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे या गावांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.ग्रामविकास विभागाकडे ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याकरिता शासनास प्राप्त झालेले प्रस्ताव राज्य निकष समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आले होते. या समितीच्या निकषाप्रमाणे प्रस्तावातील कागदपत्रांची तपासणी करून समितीने बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील चांद शाहवली बाबा दर्गा, महादेव मंदिर, निफाड तालुक्यातील सुभाषनगर येथील श्री लोणजाई माता मंदिर, सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील सदूबाई देवस्थान यांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रचा दर्जा प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पाटील यांनी दिली.जायखेडा गावाच्या माध्यमातून बागलाणला प्रथमच ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. वारकरी संप्रदायची परंपरा जोपासणाºया कृष्णाजी माउली यांच्यामुळे जायखेडा गावाला प्राप्त आहे. दरवर्षी या गावात माउलींच्या प्रेरणेने संत मिलन सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यास गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक भाविक जायखेडा येथे हजेरी लावतात. तसेच दरवर्षी पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर येथे जायखेडा येथून वारकºयांची पायी दिंडी काढण्यात येते. यामुळे जायखेडा ही उत्तर महाराष्ट्रातील वारकºयांची पंढरी मानली जाते. तसेच हिंदू-मुस्लिमांचे ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाºया चांद शाहवली बाबांचा दर्गादेखील जायखेडा पोलीस ठाण्यात आहे. दरवर्षी बाबांचा उरूस भरविण्यात येतो.यानिमित्त मोठा यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. याच ठिकाणी महादेव मंदिर उभारण्यात आले आहे. या देवभूमीमुळे या गावाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे गाव विकासाला आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून बागलाणमध्ये प्रथमच आमच्या जायखेडा गावाला मान मिळाला आहे. या दर्जामुळे रस्ता काँक्र ीटीकरणाची कामे केली जाणार आहेत. तसेच भाविकांच्या निवासाची सोय, नदीघाटची निर्मिती करून नदीपात्राचे सुशोभीकरण करून सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न केला जाईल.- यतिन पगार, सभापती, शिक्षण व आरोग्य समिती, जिल्हा परिषद