शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्ह्यातील तीन तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:01 IST

सटाणा : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत राज्य निकष समितीने जिल्ह्यातील तीन गावांतील तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात बागलाण तालुक्यातील जायखेडा गावाचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना ‘ब’वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे या गावांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

ठळक मुद्देसिन्नर, डुबेरेचा समावेशवारकºयांची पंढरी जायखेड्याचा होणार विकास

सटाणा : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत राज्य निकष समितीने जिल्ह्यातील तीन गावांतील तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात बागलाण तालुक्यातील जायखेडा गावाचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना ‘ब’वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे या गावांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.ग्रामविकास विभागाकडे ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याकरिता शासनास प्राप्त झालेले प्रस्ताव राज्य निकष समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आले होते. या समितीच्या निकषाप्रमाणे प्रस्तावातील कागदपत्रांची तपासणी करून समितीने बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील चांद शाहवली बाबा दर्गा, महादेव मंदिर, निफाड तालुक्यातील सुभाषनगर येथील श्री लोणजाई माता मंदिर, सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील सदूबाई देवस्थान यांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रचा दर्जा प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पाटील यांनी दिली.जायखेडा गावाच्या माध्यमातून बागलाणला प्रथमच ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. वारकरी संप्रदायची परंपरा जोपासणाºया कृष्णाजी माउली यांच्यामुळे जायखेडा गावाला प्राप्त आहे. दरवर्षी या गावात माउलींच्या प्रेरणेने संत मिलन सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यास गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक भाविक जायखेडा येथे हजेरी लावतात. तसेच दरवर्षी पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर येथे जायखेडा येथून वारकºयांची पायी दिंडी काढण्यात येते. यामुळे जायखेडा ही उत्तर महाराष्ट्रातील वारकºयांची पंढरी मानली जाते. तसेच हिंदू-मुस्लिमांचे ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाºया चांद शाहवली बाबांचा दर्गादेखील जायखेडा पोलीस ठाण्यात आहे. दरवर्षी बाबांचा उरूस भरविण्यात येतो.यानिमित्त मोठा यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. याच ठिकाणी महादेव मंदिर उभारण्यात आले आहे. या देवभूमीमुळे या गावाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे गाव विकासाला आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून बागलाणमध्ये प्रथमच आमच्या जायखेडा गावाला मान मिळाला आहे. या दर्जामुळे रस्ता काँक्र ीटीकरणाची कामे केली जाणार आहेत. तसेच भाविकांच्या निवासाची सोय, नदीघाटची निर्मिती करून नदीपात्राचे सुशोभीकरण करून सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न केला जाईल.- यतिन पगार, सभापती, शिक्षण व आरोग्य समिती, जिल्हा परिषद