शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोकणगाव फाट्यावर अपघातात तीन ठार

By admin | Updated: September 28, 2015 23:47 IST

मुंबई-आग्रा महामार्ग : पिकअपला बसची जोरदार धडक

कोकणगाव फाट्यावर अपघातात तीन ठारमुंबई-आग्रा महामार्ग : पिकअपला बसची जोरदार धडकओझर टाऊनशिप : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्यावर पिकअपला एसटी बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ११ वर्षाच्या मुलासह तीन जण ठार झाले, तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. निफाड तालुक्यातील दात्याने येथील शेतकरी रविवारी पहाटेच्या सुमारास पिंपळगाव बाजार समितीतून टमाटा विकून परत येत होते. यावेळी त्यांच्या पिकअपला नाशिकहून नंदुरबारकडे जाणाऱ्या नंदुरबार आगाराच्या बसने जोरदार धडक दिली. या अपघातात पिकअपमधून परतणाऱ्या दात्याने येथील बाळू धनवटे (४५), रावसाहेब पवार (४२), संकेत बोरसे (११) यांचा जागीच मृत्यू झाला तर पिकअपचालक संतोष बोरसे (३९), ज्ञानेश्वर शिंगाडे (३२) व बसमधील संदीप अमृतकर (४६) पिंपळनेर गंभीर जखमी झाले असून, त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पिंपळगाव पोलिसांनी नितीन शिरसाठ (३४) या बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक एस. एस. साळुंखे यांच्यासह पिंपळगाव पोलीस अपघाताचा अधिक तपास करीत आहे. (वार्ताहर) दात्याणे गावावर शोककळा

कसबे सुकेणे : मुंबई - आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्यावर रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात निफाड तालुक्यातील दात्याणे येथील तीन जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, गणेश विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या दुर्घटनेमुळे ओझर ते सुकेणेदरम्यानचा संपूर्ण बाणगंगा काठ हळहळला आहे. टमाटा विकून दात्याणे गावाकडे परतणाऱ्या या शेतकऱ्यांवर रविवारी रात्री काळाने घाला घातला. दोन हरहन्नरी तरूण प्रगतिशील शेतकरी तर बारावर्षीय मुलाचा या अपघातात मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. दात्याणे ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले नरेंद्र ऊर्फ बाळासाहेब पंढरीनाथ धनवटे (४५) 1यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तर रावसाहेब मुरलीधर पवार (४५) यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. तर बारा वर्षीय संकेत संतोष बोरसे हा दात्याणे गावातील नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तू तुपे यांचा एकुलता एक नातू आहे. एकाच गावातील तीन जणांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून, शेतकरी कुटुंबातील कर्ते पुरूष काळाच्या पडद्याआड झाल्याने पवार व धनवटे कुटुंब पोरके झाले आहे. दात्याणे येथील अमरधाममध्ये या तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दात्याणे, जिव्हाळे व परिसरातील गावांनी व्यवहार बंद ठेवून या तिघांना श्रद्धांजली वाहिली.