शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

तीन राज्यमार्ग अहस्तांतरित

By admin | Updated: April 25, 2017 02:29 IST

नाशिक : राज्य महामार्गावरील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आल्यानंतर दारू दुकानांना अभय मिळण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांचा आटापिटा सुरू आहे.

नाशिक : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पाचशे मीटर अंतरावर मद्यविक्रीची दुकाने १ एप्रिलपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बंद करण्यात आल्यानंतर दारू दुकानांना अभय मिळण्यासाठी विक्रेत्यांसह राजकीय पुढाऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. त्यासाठी शहरातून जाणारे राज्यमार्ग हे महापालिकेकडे हस्तांतरित झाले असल्याचे दर्शविले जात असले तरी पाचपैकी तीन राज्यमार्ग हे महापालिकेकडे हस्तांतरितच झाले नसल्याचे आणि त्याबाबत अभिलेखात नोंदीच आढळून येत नसल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला महापालिकेने पाठविले आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पाचशे मीटर अंतरावर मद्यविक्रीची दुकाने १ एप्रिल २०१७ पासून बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महामार्गावरील दारूविक्रीला रोख बसला आहे. मात्र, न्यायालयाच्या या आदेशाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी ज्या शहरांमध्ये वळण रस्त्यांची बांधकामे झाली असतील तेथे शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्ग अवर्गीकृत (डिनोटीफाइड) करून स्थानिक महापालिका वा नगरपालिकांकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत. त्यातच मद्यविक्रेत्यांच्या लॉबीने राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून राज्यमार्ग हे महापालिकेकडे यापूर्वीच हस्तांतरित असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संबंधित मार्गावर लागू होत नसल्याची भूमिका घेतली जात आहे. दरम्यान, कोणते राज्यमार्ग महापालिकेकडे हस्तांतरित झाले आहेत यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागापासून ते सार्वजनिक बांधकाम विभाग, हॉटेल्स अ‍ॅण्ड बार असोसिएशन ते शिवसेना खासदारांपर्यंत सर्वांनी विचारणा केली होती. त्यानुसार, महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठविले असून, त्यात शहरातून जाणारे पाचपैकी तीन राज्यमार्ग हे मनपाकडे हस्तांतरितच झाले नसल्याचे आणि त्यासंबंधीची कागदपत्रेही उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नाशिक-पेठ राज्यमार्ग क्रमांक ३७ हा पेठनाका ते मनपा हद्दीपर्यंत ११.६०० कि.मी.चा आहे. सदर रस्ता मनपा हद्दीपर्यंत नाशिक महापालिकेकडे दुरुस्ती व देखभालीसाठी वर्ग करण्यात आलेला आहे, परंतु त्याबाबतचे कोणतेही ठराव व हस्तांतरणबाबतचा शासननिर्णय अभिलेखात आढळून आलेला नाही. सदरच्या रस्त्याची महापालिकेमार्फत दुरुस्ती व देखभाल करण्यात येत आहे आणि महापालिकेच्या विकास योजना आराखड्यातही तो ३० मीटर रुंदीचा डी.पी. रस्ता म्हणून दर्शविलेला आहे. नाशिक-गंगापूर या अशोकस्तंभ ते मनपाहद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती व देखभाल १९९५-९६ पासून महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. परंतु या रस्त्याचीही हस्तांतरणाची कोणतेही कागदपत्रे महापालिकेकडे आढळून येत नसल्याचे म्हटले आहे.सदर रस्ताही मनपाच्या विकास आराखड्यात ३० मीटर रुंदीचा डी.पी. रस्ता दर्शविलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाशिक-औरंगाबाद या राज्यमार्गावरील मनपा हद्दीतील रस्ताही महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे या तीन राज्यमार्गावरील मद्यविक्रीच्या दुकानांवर गंडांतर कायम आहे.