शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

नाशिकच्या पूर्व भागातील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 01:07 IST

एरव्ही जून व जुलै महिन्यात वाट पहायला लावणाºया पावसाने जिल्ह्णातील पूर्व भागात यंदा लवकर हजेरी लावल्यामुळे आशा पल्लवित झालेल्या शेतकºयांनी पेरणीला प्राधान्य दिले असले तरी, त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे नुकतेच उन्हं धरायला आलेली पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

नाशिक : एरव्ही जून व जुलै महिन्यात वाट पहायला लावणाºया पावसाने जिल्ह्णातील पूर्व भागात यंदा लवकर हजेरी लावल्यामुळे आशा पल्लवित झालेल्या शेतकºयांनी पेरणीला प्राधान्य दिले असले तरी, त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे नुकतेच उन्हं धरायला आलेली पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.जिल्ह्णात वार्षिक सरासरीच्या ८० टक्के पावसाची नोंद आजवर झाली असली तरी, अद्यापही मालेगाव, बागलाण, देवळा, येवला, नांदगाव या पूर्व भागातील तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी पन्नास टक्के इतकीच आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस पाऊस हजेरी लावत असल्यामुळे पूर्व भागात पीक पेरणी उशिराने केली जात होती. पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा या तालुक्यात भात, नागली या पिकांसाठी उत्तम वातावरण असून नाशिक, दिंडोरी या तालुक्यात प्रामुख्याने भाजीपाला घेतला जातो. परंतु आॅगस्ट महिन्यातील गेल्या आठ दिवसांपासून या तालुक्यांकडेही पावसाने वक्रदृष्टी केली आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार पश्चिम भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने तेथील पिकांना जीवदान मिळू लागले आहे, परंतु भाजीपाला घेतल्या जाणाºया भागात पावसाची सातत्याने गरज आहे. पूर्व भागातील मका, सोयाबीन या पिकांची लागवड होऊन त्यांना आता खºया अर्थाने पाण्याची गरज आहे, परंतु भर पावसाळ्यात कडक उन्हाचा तडाखा पिकांना सहन करावा लागत आहे. आणखी आठ ते दहा दिवस पाऊस न झाल्यास पूर्व भागातील पिके धोक्यात येऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.