शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी हजारो हेक्टरचे नुकसान

By admin | Updated: March 20, 2015 23:01 IST

मालेगावी हजारो हेक्टरचे नुकसान

मालेगाव : तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने वीज पडून शेळीसह सात जनावरांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात गारपीट व विजांसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांबरोबरच फळबागांचे मोठे नुकसान केले. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना काही ठिकाणी पशुधनालाही मुकावे लागले. तालुक्यात दि. ११ ते १५ मार्चदरम्यान काही ठिकाणी गारपीट व विजांसह पाऊस झाला. वीज पडल्यामुळे अस्ताणे, वळवाडी, अजंग, लखाणे या गावात पाच जनावरे मृत्युमुखी पडले, तर चिंचगव्हाण येथे भावसिंग मांडवडे यांच्या पाचटाच्या झोपडीचे नुकसान झाले.यात अजंगच्या गिरीश पवार यांचे दोन बैल, वळवाडी येथील आप्पाजी पाटील व लखाणे येथील कैलास पगार या दोघांचा प्रत्येकी एक बैल, तर अस्ताणचे गंगाधर देवरे यांचा गोऱ्हा. १५ मार्च रोजी पडलेल्या पावसात उंबरदे येथे एक बैल व कंक्राळे येथे भिंत कोसळल्याने शेळीचा मृत्यू झाला.पावसाने पिकांचे नुकसान केले. महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार १५ मार्च रोजी कोठरे, दुंधे, तळवाडे, रावळगाव आदि भागात झालेल्या पाऊसाने कांदा, भाजीपाला याबरोबरच डाळींबबागांचे नुकसान झाले. त्यात दुधे येथील १२५ हेक्टर कांदा, ६५ हेक्टर डाळींब, ६ हेक्टर भाजीपाला, तळवाडे येथील २५० हेक्टर कांदा, १८० हेक्टर डाळींब, १० हेक्टर भाजीपाला, पांढरुण ५५ हेक्टर कांदा, १२५ हेक्टर डाळींब, रावळगाव कांदा व डाळिंबाचे प्रत्येकी ५० हेक्टर, तर कोठरे बु।। १५५ हेक्टर कांदा, ६२ हेक्टर गहू, १२ हेक्टर मका, प्रत्येकी ५ हेक्टर हरबरा व कांदा बी तसेच कोठरे खु।। हेक्टर कांदा, ८० हेक्टर गहू, १० हेक्टर मका, ४ हेक्टर हरबरा व २ हेक्टर कांदा बी या पावसाने बाधित झाले आहे. तहसील व कृषी विभागाकडून या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)