शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार घरकुले पालिका वगळणार

By admin | Updated: August 28, 2014 01:13 IST

आर्थिक घोटाळ्यांमुळे महापालिकेच्या गाजलेल्या घरकुल योजनेचा गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू करण्यात आली असून, ११ हजार २00 घरांपैकी आता फक्त नऊ हजार ७00 घरे बांधण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

 घोळ मिटेना : निधी संपूनही अद्याप योजना होईना पूर्ण

नाशिक : आर्थिक घोटाळ्यांमुळे महापालिकेच्या गाजलेल्या घरकुल योजनेचा गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू करण्यात आली असून, ११ हजार २00 घरांपैकी आता फक्त नऊ हजार ७00 घरे बांधण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. कागदोपत्री मात्र महापालिकेने सहा हजार ९६४ घरकुले अखेरच्या टप्प्यात असल्याचे सांगून आता चार हजार २३६ घरे बांधण्यात येणार असल्याचे सांगितले असले, तरी त्यासाठी केवळ ६८ कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्यामुळे ९0 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात येणार आहे. एवढे करूनही संपूर्ण घरकुल योजना पूर्ण होणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.घरकुल घोटाळ्यासंदर्भात यापूर्वीही महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार्‍या निर्भय फाउंडेशनला माहितीच्या अधिकारात घरकुलांचे वास्तव मिळाले आहे. जवाहरलाल नेहरू नागरी अभियानाअंतर्गत महापालिकेने झोपडपट्टीवासीयांसाठी १६ हजार घरकुले बांधण्याची योजना आखली होती. परंतु नंतर जागा उपलब्ध नाही आणि अन्य अनेक कारणांमुळे ११ हजार २00 घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी २४८ कोटी रुपये खर्च करून ही घरकुले बांधण्यात येणार होती. परंतु आत्तापर्यंत १८१ कोटी रुपये खर्च करून योजना पूर्ण झालेली नाही. झोपडपट्टीवासीयांना महापालिकेने २१२0 घरकुले दिल्याचा दावा केला आहे. तसेच २४२0 घरे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे एकूण सहा हजार ९६४ घरांची कामे सुरू असून, आणखी चार हजार २३६ घरकुले बांधण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाने निर्भय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज पिंगळे यांनी मागविलेल्या माहितीच्या अधिकारात स्पष्ट केले आहे. महापालिकेला चार हजार २३६ घरे बांधण्यासाठी अवघे ६८ कोटी रुपये शिल्लक असून, त्याचा विचार केला तर एका घरकुलासाठी केवळ ६५ हजार रुपये इतकाच निधी वापरता येणार असल्याने इतक्या रकमेत घरकुल योजना राबविणे केवळ अशक्यप्राय आहे. त्यामुळे महापालिकेने हुडकोकडून ९0 कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची तयारी केली आहे. एकीकडे ही आकडेवारी प्रशासन देत असली, तरी प्रत्यक्षात नऊ हजार ७00 घरेच पूर्ण होणार असल्याचे पालिकेच्या प्रगतीपर अहवालात म्हंटले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकार्‍यांनी देखील जाग आणि अन्य अडचणींमुळे ११ हजार २00 घरेदेखील पूर्ण होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे योजनेत घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याची चौकशी करण्याची मागणी निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज पिंगळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी) -----------------------------------न्यायालयात जाणार■ पालिकेने उच्च न्यायालयात ११ हजार २00 घरे पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. परंतु आता इतकी घरे पूर्ण होत नसतील तर तो न्यायालयाचा अवमान आहे. यासंदर्भात न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली जाणार आहे. घरकुल योजेनतील सर्व घोळ आणि त्याप्रमाणे गैरप्रकारांबाबत जबाबदारी निश्‍चित करून कारवाईची मागणी केली जाईल.- मनोज पिंगळे, संस्थापक, निर्भय फाऊंडेशन --------------------------------योजनेतील गोंधळ■ सात वर्षांनंतरही योजना अपूर्णच■ चुंचाळे शिवारात शहराबाहेर सहा हजार घरकुले बांधण्याचा अट्टहास■ झोपडपट्टीच्या ठिकाणीच घरकुल योजना राबविण्याऐवजी अन्यत्र राबविल्या.■ आनंदवल्लीत जागा ताब्यात नसताना घरकुल योजना राबविण्यासाठी निविदा मंजूर केल्या. त्यानंतर घरे न बांधताही साडेतीन कोटी रुपये ठेकेदारास अदा केले.■ गंगापूर येथे घरकुल योजना रद्द मात्र ती नाशिकरोडला राबवल्याचे दाखवून ठेकेदाराला देयके दिली.■ नाशिकरोड येथे घरकुले बांधता येणार नाही म्हणून निधी परत पाठविला आता पुन्हा तेथेही योजना राबविली.