शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

‘त्या’ महिलांचे हिंदुत्ववाद्यांशी साटेलोटे

By admin | Updated: March 14, 2016 00:19 IST

तृप्ती देसाई : बैठक न घेतल्यास १९ मार्चला त्र्यंबकच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा इशारां

 नाशिक : हिंदुत्ववाद्यांशी आर्थिक व्यवहार करून दुर्गा शुक्रे यांनी आपल्या बदनामीचे षड्यंत्र रचल्याचा सनसनाटी आरोप भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानशी वाटाघाटी करणाऱ्या या महिलांचा भूमाता ब्रिगेडशी कोणताही संबंध नसून, त्यांची १० फेब्रुवारी रोजीच मूळ संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचा दावाही देसाई यांनी केला आहे.त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश द्यावा, या मागणीसाठी तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ७ मार्च रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्याला त्र्यंबकेश्वरवासीयांनी तीव्र विरोध केला होता. प्रशासनाने देसाई यांना कार्यकर्त्यांसह नांदूरशिंगोटे येथेच रोखल्याने संघर्ष टळला होता; मात्र देसाई यांनी त्र्यंबक देवस्थानसमवेत बैठक बोलावण्यासाठी दहा दिवसांची मुदत जिल्हा प्रशासनाला दिली होती. शनिवारी भूमाता महिला ब्रिगेडच्या दुर्गा शुक्रे, पुष्पक केवाडकर, प्रियंका जगताप आदिंनी त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये बैठक घेऊन तृप्ती देसाई यांची भूमाता ब्रिगेडमधून हकालपट्टी केल्याचे वक्तव्य केले होते. गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय धर्मसंसद घेईल, असा निर्णयही घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर देसाई यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधल्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या आपण संस्थापक अध्यक्ष असून, २७ सप्टेंबर २०१० रोजी या संघटनेची स्थापना केली. शुक्रे, केवाडकर, जगताप या आपल्या संघटनेच्या सदस्य होत्या; मात्र शनिशिंगणापूरच्या आंदोलनानंतर मला प्रसिद्धीचा हव्यास असल्याचा आरोप करीत त्या संघटनेतून बाहेर पडल्या. त्यांनी राजीनामेही पाठवले नाहीत. त्यामुळे १० फेब्रुवारी रोजी मीच त्यांची हकालपट्टी केली. मी संस्थापक अध्यक्ष असताना त्या माझी हकालपट्टी कशी करू शकतात? त्यानंतर सात-आठ दिवसांनी त्यांनी आमच्या संघटनेशी नामसाधर्म्य असलेली ‘भूमाता महिला ब्रिगेड’ नामक संघटनेची स्थापना केली. या संघटनेनेच आता हिंदुत्ववाद्यांशी हात मिळवून मला बदनाम करण्याचे कारस्थान रचले आहे. त्यांना आपण आजपर्यंत एकही फोन केलेला नाही. त्यामुळे मी त्यांना धमकी देत असल्याचे खोटे सांगितले जात आहे. मी राज्यात ठिकठिकाणी प्रबोधन परिषदा घेत असून, त्यांना धमकी देण्याचा संबंधच काय, असा सवालही देसाई यांनी उपस्थित केला. दरम्यान, त्र्यंबकेश्वरला जाऊन आपली बदनामी करणाऱ्या या महिलांवर आपण बदनामीचा खटला दाखल करू, असा इशाराही देसाई यांनी दिला असून, या संघटनेत अवघ्या चार-पाच महिला आहेत, तर आपल्या संघटनेशी सात ते आठ हजार महिला संलग्न असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)