शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ महिलांचे हिंदुत्ववाद्यांशी साटेलोटे

By admin | Updated: March 14, 2016 00:19 IST

तृप्ती देसाई : बैठक न घेतल्यास १९ मार्चला त्र्यंबकच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा इशारां

 नाशिक : हिंदुत्ववाद्यांशी आर्थिक व्यवहार करून दुर्गा शुक्रे यांनी आपल्या बदनामीचे षड्यंत्र रचल्याचा सनसनाटी आरोप भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानशी वाटाघाटी करणाऱ्या या महिलांचा भूमाता ब्रिगेडशी कोणताही संबंध नसून, त्यांची १० फेब्रुवारी रोजीच मूळ संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचा दावाही देसाई यांनी केला आहे.त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश द्यावा, या मागणीसाठी तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ७ मार्च रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्याला त्र्यंबकेश्वरवासीयांनी तीव्र विरोध केला होता. प्रशासनाने देसाई यांना कार्यकर्त्यांसह नांदूरशिंगोटे येथेच रोखल्याने संघर्ष टळला होता; मात्र देसाई यांनी त्र्यंबक देवस्थानसमवेत बैठक बोलावण्यासाठी दहा दिवसांची मुदत जिल्हा प्रशासनाला दिली होती. शनिवारी भूमाता महिला ब्रिगेडच्या दुर्गा शुक्रे, पुष्पक केवाडकर, प्रियंका जगताप आदिंनी त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये बैठक घेऊन तृप्ती देसाई यांची भूमाता ब्रिगेडमधून हकालपट्टी केल्याचे वक्तव्य केले होते. गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय धर्मसंसद घेईल, असा निर्णयही घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर देसाई यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधल्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या आपण संस्थापक अध्यक्ष असून, २७ सप्टेंबर २०१० रोजी या संघटनेची स्थापना केली. शुक्रे, केवाडकर, जगताप या आपल्या संघटनेच्या सदस्य होत्या; मात्र शनिशिंगणापूरच्या आंदोलनानंतर मला प्रसिद्धीचा हव्यास असल्याचा आरोप करीत त्या संघटनेतून बाहेर पडल्या. त्यांनी राजीनामेही पाठवले नाहीत. त्यामुळे १० फेब्रुवारी रोजी मीच त्यांची हकालपट्टी केली. मी संस्थापक अध्यक्ष असताना त्या माझी हकालपट्टी कशी करू शकतात? त्यानंतर सात-आठ दिवसांनी त्यांनी आमच्या संघटनेशी नामसाधर्म्य असलेली ‘भूमाता महिला ब्रिगेड’ नामक संघटनेची स्थापना केली. या संघटनेनेच आता हिंदुत्ववाद्यांशी हात मिळवून मला बदनाम करण्याचे कारस्थान रचले आहे. त्यांना आपण आजपर्यंत एकही फोन केलेला नाही. त्यामुळे मी त्यांना धमकी देत असल्याचे खोटे सांगितले जात आहे. मी राज्यात ठिकठिकाणी प्रबोधन परिषदा घेत असून, त्यांना धमकी देण्याचा संबंधच काय, असा सवालही देसाई यांनी उपस्थित केला. दरम्यान, त्र्यंबकेश्वरला जाऊन आपली बदनामी करणाऱ्या या महिलांवर आपण बदनामीचा खटला दाखल करू, असा इशाराही देसाई यांनी दिला असून, या संघटनेत अवघ्या चार-पाच महिला आहेत, तर आपल्या संघटनेशी सात ते आठ हजार महिला संलग्न असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)