शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

मनसे सोडणाऱ्यांना पुन्हा ‘नो एण्ट्री’?

By admin | Updated: January 3, 2017 23:39 IST

काहींना घरवापसीचे वेध : उमेदवारीबाबत वाढली स्पर्धा

नाशिक : महापालिकेत सत्ताधारी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तब्बल २६ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत सेना-भाजपाशी घरोबा केला आहे. परंतु, आता सेना-भाजपात मनसेतून आलेल्या नगरसेवकांना उमेदवारी देण्याबाबत पक्षातूनच विरोधाचे सूर उमटू लागल्याने संबंधित दलबदलूंना घाम फुटला आहे. त्यातून काही नगरसेवकांना पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले असले तरी मनसेने मात्र पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा दारात उभे न करण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्राने दिली. त्यामुळे येत्या काळात काहींची अवस्था ‘ना घरका ना घाटका’ अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको.  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे सुरू आहेत. त्याचा सर्वाधिक फटका हा सत्ताधारी मनसेला बसला आहे. मनसेच्या आतापर्यंत एका स्वीकृत सदस्यासह तब्बल २६ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. त्यात मनसेचे सर्वाधिक १६ सदस्य हे शिवसेनेत तर उर्वरित १० सदस्य हे भाजपात दाखल झालेले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेनेच सदर सदस्यांनी पक्षांतर केलेले आहे, तर अनेकांना उमेदवारीबाबत शब्द दिला नसल्याचे सेना-भाजपातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.  मनसेतून सेना-भाजपात दाखल झालेल्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत आता दोन्ही पक्षांतील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून विरोधाचा सूर आळवला जाऊ लागला आहे. काही नगरसेवकांची पुन्हा निवडून येण्याची क्षमताच नसल्याचेही वरिष्ठ स्तरावर पटवून दिले जात आहे. त्यामुळे, मनसेतून गेलेल्या सर्वांनाच पुन्हा उमेदवारी मिळेलच याची शाश्वती उरलेली नाही. त्यातच, काही नगरसेवकांनी सेना-भाजपात तिकिटासाठी वाढती स्पर्धा पाहून उमेदवारी मिळण्याबाबत धसका घेतला आहे. त्यांची अवस्था केविलवाणी बनली असून, पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत. परंतु, मनसेने मात्र आता पक्षाशी गद्दारी करून बाहेर गेलेल्यांना पुन्हा दरवाजे बंद असल्याची भूमिका घेतल्याचे समजते. त्यामुळे संबंधितांची घरवापसी अशक्य बनणार आहे. परिणामी, त्यांच्या एकूणच राजकीय अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह लटकले आहे. (प्रतिनिधी)