शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

मनसे सोडणाऱ्यांना पुन्हा ‘नो एण्ट्री’?

By admin | Updated: January 3, 2017 23:39 IST

काहींना घरवापसीचे वेध : उमेदवारीबाबत वाढली स्पर्धा

नाशिक : महापालिकेत सत्ताधारी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तब्बल २६ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत सेना-भाजपाशी घरोबा केला आहे. परंतु, आता सेना-भाजपात मनसेतून आलेल्या नगरसेवकांना उमेदवारी देण्याबाबत पक्षातूनच विरोधाचे सूर उमटू लागल्याने संबंधित दलबदलूंना घाम फुटला आहे. त्यातून काही नगरसेवकांना पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले असले तरी मनसेने मात्र पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा दारात उभे न करण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्राने दिली. त्यामुळे येत्या काळात काहींची अवस्था ‘ना घरका ना घाटका’ अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको.  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे सुरू आहेत. त्याचा सर्वाधिक फटका हा सत्ताधारी मनसेला बसला आहे. मनसेच्या आतापर्यंत एका स्वीकृत सदस्यासह तब्बल २६ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. त्यात मनसेचे सर्वाधिक १६ सदस्य हे शिवसेनेत तर उर्वरित १० सदस्य हे भाजपात दाखल झालेले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेनेच सदर सदस्यांनी पक्षांतर केलेले आहे, तर अनेकांना उमेदवारीबाबत शब्द दिला नसल्याचे सेना-भाजपातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.  मनसेतून सेना-भाजपात दाखल झालेल्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत आता दोन्ही पक्षांतील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून विरोधाचा सूर आळवला जाऊ लागला आहे. काही नगरसेवकांची पुन्हा निवडून येण्याची क्षमताच नसल्याचेही वरिष्ठ स्तरावर पटवून दिले जात आहे. त्यामुळे, मनसेतून गेलेल्या सर्वांनाच पुन्हा उमेदवारी मिळेलच याची शाश्वती उरलेली नाही. त्यातच, काही नगरसेवकांनी सेना-भाजपात तिकिटासाठी वाढती स्पर्धा पाहून उमेदवारी मिळण्याबाबत धसका घेतला आहे. त्यांची अवस्था केविलवाणी बनली असून, पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत. परंतु, मनसेने मात्र आता पक्षाशी गद्दारी करून बाहेर गेलेल्यांना पुन्हा दरवाजे बंद असल्याची भूमिका घेतल्याचे समजते. त्यामुळे संबंधितांची घरवापसी अशक्य बनणार आहे. परिणामी, त्यांच्या एकूणच राजकीय अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह लटकले आहे. (प्रतिनिधी)