शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

हॉटेल्समध्ये थर्टी फर्स्टलाही राहणार शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:13 IST

नाशिक : कोरोनामुळे टाळेबंदी आणि गेल्या सात ते आठ महिन्यांपासून लागू करण्यात असलेल्या निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत ...

नाशिक : कोरोनामुळे टाळेबंदी आणि गेल्या सात ते आठ महिन्यांपासून लागू करण्यात असलेल्या निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत असतानाच आता ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या कालावधीतही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी थर्टी फर्स्ट आल्याने अशा विविध निर्बंधांमुळे हॉटेल व्यावसायिकांसमोरील अडचणीत वारंवार वाढ होत आहे. त्यामुळे, यापुढील काळात पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी नाशिक जिल्हा हॉटेल्स, बार असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

राज्यातील विविध शहरे व जिल्ह्यांत रोज नवे रुग्ण आढळत असल्याने पुन्हा कडक लॉकडाऊन, संचारबंदी व अधिक निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली आहे. संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारतर्फेही पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बारसारख्या व्यवसायातील अर्थकारण बिघडत आहे. त्यामुळेच दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन असतानाही संसर्ग थांबू शकलेला नाही, तर आता चार दिवस, सात दिवस वा दहा दिवस संचारबंदी आणि निर्बंध यांमुळे रुग्णवाढ थांबेल का, असा प्रश्न हॉटेल व्यवसायातील कामगारांपासून व्यावसायिकांपर्यंत सारेच विचारत आहेत. सध्या नाशिकमध्ये हॉटेल व्यावसायिकांना केवळ रात्री ९ वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी असून, दहा वाजता हॉटेल्स बंद करावी लागतात. त्यामु‌ळे ग्राहक येण्याच्या वेळीच हॉटेल्स बंद करावी लागत असल्याने व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांमध्ये उमटत आहे.

कोट-१

कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे व्यावसायिकांना हॉटेल कामगारांचे वेतन, वीज बिल, पाणी बिल, देखभाल खर्च, जागेचे भाडे आदी खर्च भागविणे शक्य होत नसल्याने जवळपास शहरातील ४० टक्के हॉटेल्स बंद पडले आहेत. त्यामुळे यापुढील काळात पूर्वीप्रमाणे रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्याची गरज आहे.

-संजय चव्हाण, अध्यक्ष, नाशिक जिल्हा हॉटेल, बार असोसिएशन.

इन्फो-१

शुल्कमाफीच्या निर्णयाने अल्प दिलासा

कोरोनाकाळातील टाळेबंदी आणि निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत असल्याने संपूर्ण परवाना शुल्क माफ करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली होती. मात्र, शासनाने ५० टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी मिळावी, अशी मागणी हॉटेल चालकांच्या संघटनेकडून होत आहे.