शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हॉटेल्समध्ये थर्टी फर्स्टलाही राहणार शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:13 IST

नाशिक : कोरोनामुळे टाळेबंदी आणि गेल्या सात ते आठ महिन्यांपासून लागू करण्यात असलेल्या निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत ...

नाशिक : कोरोनामुळे टाळेबंदी आणि गेल्या सात ते आठ महिन्यांपासून लागू करण्यात असलेल्या निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत असतानाच आता ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या कालावधीतही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी थर्टी फर्स्ट आल्याने अशा विविध निर्बंधांमुळे हॉटेल व्यावसायिकांसमोरील अडचणीत वारंवार वाढ होत आहे. त्यामुळे, यापुढील काळात पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी नाशिक जिल्हा हॉटेल्स, बार असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

राज्यातील विविध शहरे व जिल्ह्यांत रोज नवे रुग्ण आढळत असल्याने पुन्हा कडक लॉकडाऊन, संचारबंदी व अधिक निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली आहे. संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारतर्फेही पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बारसारख्या व्यवसायातील अर्थकारण बिघडत आहे. त्यामुळेच दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन असतानाही संसर्ग थांबू शकलेला नाही, तर आता चार दिवस, सात दिवस वा दहा दिवस संचारबंदी आणि निर्बंध यांमुळे रुग्णवाढ थांबेल का, असा प्रश्न हॉटेल व्यवसायातील कामगारांपासून व्यावसायिकांपर्यंत सारेच विचारत आहेत. सध्या नाशिकमध्ये हॉटेल व्यावसायिकांना केवळ रात्री ९ वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी असून, दहा वाजता हॉटेल्स बंद करावी लागतात. त्यामु‌ळे ग्राहक येण्याच्या वेळीच हॉटेल्स बंद करावी लागत असल्याने व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांमध्ये उमटत आहे.

कोट-१

कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे व्यावसायिकांना हॉटेल कामगारांचे वेतन, वीज बिल, पाणी बिल, देखभाल खर्च, जागेचे भाडे आदी खर्च भागविणे शक्य होत नसल्याने जवळपास शहरातील ४० टक्के हॉटेल्स बंद पडले आहेत. त्यामुळे यापुढील काळात पूर्वीप्रमाणे रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्याची गरज आहे.

-संजय चव्हाण, अध्यक्ष, नाशिक जिल्हा हॉटेल, बार असोसिएशन.

इन्फो-१

शुल्कमाफीच्या निर्णयाने अल्प दिलासा

कोरोनाकाळातील टाळेबंदी आणि निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत असल्याने संपूर्ण परवाना शुल्क माफ करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली होती. मात्र, शासनाने ५० टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी मिळावी, अशी मागणी हॉटेल चालकांच्या संघटनेकडून होत आहे.