शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील तीस कुटुंबे वाळीत

By admin | Updated: January 18, 2016 23:22 IST

जातपंचायतीचा जाच : परभणीतील दाम्पत्याला घ्यावा लागला नाशकात आसरा

नाशिक : जातपंचायतीच्या जाचामुळे परभणीतील दाम्पत्याला स्वत:चे गाव सोडून नाशकात आसरा घेण्याची वेळ आली आहे. या दाम्पत्याला अद्यापही जातपंचायतीच्या धमक्या येत असून, हे दाम्पत्य पोलिसांत तक्रार करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या प्रकरणाबरोबरच परभणीतील गोंधळी समाजाच्या जातपंचायतीने नाशिकमधील आणखी तीस कुटुंबे वाळीत टाकल्याची धक्कादायक बाबही उघड झाली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी हा प्रकार उजेडात आणला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील सेलू येथे राहणारे दीपक मोरे व त्यांची पत्नी सोनी मोरे यांनी आपल्या गोंधळी समाजाच्या पंचांकडून भिशीच्या स्वरूपात ८० ते ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करताना या दाम्पत्याने मूळ रकमेच्या तीनपट व्याज भरले, प्रत्येक वसुलीच्या वेळी पंचांना दारू-मटणाचा पाहुणचारही केला. तरी मुद्दल रक्कम ‘जैसे थे’ होती. पंचांकडून त्यांच्याकडे सहा ते सात लाख रुपयांची मागणी केली जात होती. दोन वर्षांपूर्वी पंचांनी घरात घुसून सोनी मोरे यांच्याशी असभ्य वर्तन केले, धमक्या दिल्या, त्यांच्या घराच्या दरवाजावर त्यांना बहिष्कृत केल्याची खूण म्हणून चप्पल बांधली. घरातील संसारोपयोगी वस्तू, घराचे पत्रे काढून नेले. या प्रकाराला घाबरून या दाम्पत्याने गावातून पळ काढत नाशिक गाठले व नातेवाईक सुभाष उगले यांच्याकडे आसरा घेतला; मात्र पंचांनी उगले यांनाही धमक्या दिल्या. त्यांना परभणीहून ‘वाळपत्र’ पाठवून समाजातून बहिष्कृत करण्यात आले. त्यामुळे उगले व मोरे आता पोलिसांत जाण्याच्या तयारीत आहेत. सध्या दीपक मोरे हे नाशिकमध्ये गटार स्वच्छता, तर त्यांची पत्नी जुने कपडे विकून उपजीविका करीत आहे. दरम्यान, परभणीच्या जातपंचायतीने विविध कारणांवरून बहिष्कृत केलेली शहरात तीस कुटुंबे असून, त्यांना समाजातील विवाह, मृत्यू या गोष्टींपासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप या कुटुंबांनी केला आहे. (प्रतिनिधी)