शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

दुष्काळात तेरावा; महाविद्यालयातच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:11 IST

नाशिक: महाविद्यालयांमधून शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी कोरोना निर्बंधामुळे रखडली ...

नाशिक: महाविद्यालयांमधून शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी कोरोना निर्बंधामुळे रखडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची देखील शक्यता आहे. पोर्टलवर दाखल झालेल्या अर्जांपैकी समाजकल्याण विभागाने काही प्रकरणे मंजूर केलेली आहे तर महाविद्यालयाकडे हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत.

कोरोना निर्बंधामुळे महाविद्यालये बंद असल्यामुळे बाहेरगावची मुले आपापल्या घरी परतले आहेत. समाजकल्याण विभागाने अपूर्ण असलेली प्रकरणे महाविद्यालयाला पाठवून पूर्तता करण्यास सांगितले आहे. मात्र विद्यार्थी गावी परतल्यामुळे प्रकरणांची पूर्तता अजूनही होत नसल्याने संस्था स्तरावर प्रकरणे प्रलंबित आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास १,६०२ प्रकरणे पूर्ततेच्या प्रतीक्षेत आहे.

===इन्फो--

एससी प्रवर्ग

किती अर्ज ऑनलाईन सादर केले: २५,५०५

समाजकल्याण विभागाने निकाली काढले: २०,५६४

महाविद्यालयांत प्रलंबित अर्जांची संख्या: १,६०२

--इन्फो--

विद्यार्थी गावी अडकले

महाविद्यालयांकडे आलेल्या प्रकरणांची माहिती विद्यार्थ्यांना वेळेवर दिली जात नसल्याने विद्यार्थ्यांची ऐनवेळी धावपळ होते. काही विद्यार्थी गावी परतल्यानंतर त्यांचा संपर्क होत नसल्याची कारणे महाविद्यालये देतात. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत अडचण येत आहे.

- अनिरूद्ध महाले, विद्यार्थी

शिष्यवृत्ती अर्ज भरताना तीन दिवस अगोदर महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे धावपळ करावी लागली. त्यामुळे महाविद्यालयाकडे सातत्याने विचारणा करूनही अजून प्रकरणे समाजकल्याणमध्येच असल्याची उत्तरे दिली जात आहे.

- ऋतुराज डांगळे विद्यार्थी,

--कोट--

प्रलंबित अर्जांची पूर्तता करून विभागाकडे तत्काळ सादर करण्याची कार्यवाही करण्यात यावी, प्रलंबित अर्ज प्रणालीमधून रिजेक्ट झाल्यास संबंधित विद्यार्थ्याची असलेली शिष्यवृत्ती, शिक्षण फी अदा करण्याची जबाबदारी महाविद्यालयांची असेल याबाबत प्राचार्यांनी गंभीर दखल घ्यावी. - भगवान वीर, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग.