शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तिसऱ्या दिवशीही गर्दीच

By admin | Updated: November 12, 2016 21:58 IST

मालेगाव : पैसे न मिळाल्याच्या धसक्याने इसमाचा मृत्यू

मालेगाव / आझादनगर : पाचशे व हजार रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी आज शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी विविध बँक शाखांबाहेर व एटीएम केंद्रांवर उच्चांकी गर्दी होती. शुक्रवारी दिवसभर रांगेत उभे राहूनही पैसे न मिळाल्यामुळे शहरातील मिरादातारनगर भागात राहत असलेल्या इसमाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर शुक्रवारी रात्री शहरात मीठ व साखरेचे दर वाढल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरल्याने नागरिकांनी किराणा दुकानांमध्ये साखर व मीठ खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. जमावाला हटविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले होते.गेल्या मंगळवारपासून शहरातील व्यवहार चलनाअभावी ठप्प झाले आहेत. शहरातील सर्वच बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी विक्रमी गर्दी होत आहे. तब्बल अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत नागरिक रांगा लावत आहेत. शुक्रवारी आठवडे बाजार व यंत्रमाग व्यवसायाला सुट्टी असल्यामुळे सुमारे ७० ते ८० कोटी रूपयांची नोटांची अदलाबदल करण्यात आली. शुक्रवारी दिवसभर पैसे काढण्यासाठी येथील बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेबाहेर रांगेत उभे राहूनही शेख अलाउद्दीन शेख शहाबुद्दीन (५२) रा. मिरादातारनगर या यंत्रमाग कामगाराला पैसे मिळाले नाहीत. याचा धसका घेतल्याने त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर शुक्रवारी रात्री शहरात मीठाचे व साखरेचे दर वाढल्याची अफवा सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी किराणा दुकानांमध्ये मीठ व साखर खरेदीसाठी झुंबड केली होती तर या अफवेचे सोने करण्याची संधी साधत काही दुकानदारांनी चढ्या दराने मीठ व साखरेची विक्री करत सर्वसामान्यांची आर्थिक लुट केली. पोलीसांनी शहरात गस्त वाढविली होती तसेच पोलीस वाहनांद्वारे ध्वनीक्षेपकाद्वारे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले. मीठ व साखरेचे दर बाजार भावा प्रमाणेच असल्याचे सांगितल्यानंतर नागरिकांनी किराणा दुकानांजवळ गर्दी केली होती. यामुळे काही ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार व बळाचा वापर करीत गर्दीला हटवले होते. शहरालगतच्या टेहरेशिवारात किराणा मार्केट आवारातून मीठाच्या गोण्या चोरीला गेल्याचे प्रकारही झाला. शनिवारचा दिवस उजाडल्यानंतर विविध बँकांच्या शाखांबाहेर गर्दीचा विक्रम कायम होता. सकाळपासूनच नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी गर्दी केली होती. येथील मुख्य पोस्ट कार्यालयात शनिवारी दिवसभर एक कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले. प्रत्येकी चार हजार रूपये देण्यात येत होते. पोस्ट प्रशासनाकडून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना पाणी व चॉकलेटचे वाटप केले जात होते. एकाच ओळखपत्रावर वारंवार नोटा बदलणाऱ्यांची संख्या अधिक दिसून आली. यामुळे गर्दी ओसरत नव्हती. उद्या रविवारीही पोस्ट कार्यालयात नोटा बदलून देणार असल्याची माहिती आर. एन. मोरे यांनी दिली.(वार्ताहर)