शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

जलयुक्तच्या कामांचे फेरप्रस्ताव मागविणार

By admin | Updated: July 22, 2016 00:19 IST

जलसंधारण समिती बैठक : अडीच कोटींचा निधी अखर्चित राहण्याची भीती

नाशिक : एकीकडे लोहसहभागातून धरणातील आणि बंधाऱ्यातील गाळ काढून जलयुक्तच्या कामांमध्ये पाणी साठल्याचा दावा जिल्हा प्रशासन करीत असताना, दुसरीकडे जिल्हा परिषदेने त्यांच्या स्वनिधीतून (सेस) सादर केलेले ७६ कामांपैकी ६० हून अधिक कामांचे गाळ काढण्याचे आणि खोलीकरणाचे प्रस्ताव नाकारल्याचे वृत्त आहे.गुरुवारी (दि.२१) झालेल्या जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत ही माहिती लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. जिल्हा परिषदेच्या सेस निधीच्या एकूण अर्थसंकल्पापैकी १० टक्के निधी जलयुक्तच्या कामांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेला दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने सुमारे अडीच कोटींचा निधी जलयुक्तच्या कामांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. या निधीतून जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या ७३ गटांतून ७६ कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जलयुक्त अभियान समितीकडे पाठविण्यात आले होते. मात्र त्यातील ९० टक्क्यांहून अधिक प्रस्ताव हे बंधारे आणि गावतळ्यांची खोली करणाचे व गाळ काढण्याचे प्रस्ताव असल्याने ते जिल्हाधिकारी कार्यालयाने नाकारून त्या कामांचे फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती बैठकीत लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली. कळवण विभागातील जलयुक्त शिवाराची अनेक कामे प्रलंबित असल्याने बैठकीत अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी उपअभियंता आर. बी. पाटील यांची कानउघडणी केली. तसेच जलयुक्तची कामे तत्काळ करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बैठकीत मुख्यमंत्री पेयजल योजनेची माहिती कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी दिली. राष्ट्रीय पेयजल योजनेतील कामांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्याची माहिती सदस्यांनी केली. बैठकीस उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती केदा अहेर, शोभा डोखळे, सदस्य संगीता राजेंद्र ढगे, नितीन पवार, प्रशांत बच्छाव,अलका जाधव, कार्यकारी अभियंता बापूसाहेब देसले, चंद्रशेखर वाघमारे आदि उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी त्यांच्या कक्षात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेऊन ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. (प्रतिनिधी)