शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

कडाक्याच्या उन्हाने शेतकामे ठप्प

By admin | Updated: May 20, 2016 00:27 IST

उष्णतेची लाट : ग्रामीण भागात रस्ते ओस; चांदवडचा पारा ४२ अंशांवर

 खामखेडा : परिसरामध्ये गेल्या आठवड्यात उन्हामध्ये अचानक वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस घरातून कोणीही बाहेर पडले नाही. दुपारी रस्ते ओस पडत आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.मागच्या आठवड्यात झालेला पाऊस व ठिकठिकाणी झालेली गारपिटीमुळे उष्णतेत वाढ झाल्याने अचानक उकाडा जाणवू लागला आहे. सकाळी ८ वाजेपासून सूर्यदेवता आग ओकण्यास सुरुवात करत असल्याने उकाडा जाणवू लागतो. दुपारच्या वेळेस घराबाहेर पडत नाही त्यामुळे रस्त्यावर वर्दळ दिसून नसल्याचे चित्र ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे. कडक उन्हामुळे शेतात काम करणारे मजूर व शेतकरी याच्याही कामाच्या वेळापत्रकामध्ये बदल झालेला दिसून येत आहे. सकाळी लवकर शेतात जाऊन पिकांना पाणी देणे, शेत मशागतीची कामे करून ११ वाजेनंतर घरीच आराम करून ४ वाजता पुन्हा शेतात जाऊन कामे करताना दिसत आहेत. तसेच शेतात काम करणारे शेतमजूर सकाळच्या वेळेस लवकर शेतात जाऊन दुपारी १२ वाजेपर्यंत कामे करून दुपारी झाडाच्या सावलीत आराम करून ४ वाजेनंतर पुन्हा शेतात कामे करून सायंकाळी उशिरा घरी येतात. पशुपालकही सकाळी आपली गुरे-मेंढ्या-बकऱ्या आदि जनावरे चरण्यासाठी सकाळी लवकर नेऊन दुपारच्या वेळेस आपली जनावरे झाडाच्या सावली खाली असल्याचे चित्र सर्वत्र पहावयासस मिळत आहे. या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, या कडक उष्णतेमुळे नदीकिनारी नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे. गिरणा नदीला चणकापूर व पुनंद धरणातून पाणी सोडण्यात आलेले असल्याने दुपारच्या वेळेस बालगोपाळांसह वृद्ध नदीत पोहण्याचा आनंद लुटत आहे. सध्या शिवारात जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने दुपारच्या वेळेस पशुपालक आपली जनावरे पाणी पर्जन्यासाठी नदीत नेऊन तेथेच झाडाच्या सावलीत आपली गुरे, शेळ्या-मेंढ्या बसवून नदीत डुंबण्याच्या आनंद घेताना दिसून येतात. बाहेर पडणारे डोक्यात टोपी अथवा डोक्याला उपरणे बांधून व डोळ्यावर गॉगल लावून फिरताना दिसतात.(लोकमत ब्युरो)