शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

साठ फुटीचा रस्त्याचा श्वास कधी होणार मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 16:51 IST

सटाणा : शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याला समांतर म्हणून साठ फुटी रस्ता तयार करण्यात आला आहे. या साठ फुटी रस्त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे. परंतु यारस्त्यावर लोकप्रतिनिधींचे अतिक्र मक असल्यामुळे रस्त्याचे काम ठप्प आहे. नगराध्यक्षांनी हे अतिक्र मण काढण्याची हिंमत दाखविल्यास हा रस्ता थेट मालेगाव रस्त्याला जोडला जाणार आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी दूर होण्याबरोबरच शहर विकासाचा मार्ग देखील मोकळा होणार आहे.

ठळक मुद्देसटाणा शहरातील अतिक्र मण म्हणजे नगराध्यक्षापुढे मोठे आव्हान

सटाणा : शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याला समांतर म्हणून साठ फुटी रस्ता तयार करण्यात आला आहे. या साठ फुटी रस्त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे. परंतु यारस्त्यावर लोकप्रतिनिधींचे अतिक्र मक असल्यामुळे रस्त्याचे काम ठप्प आहे.नगराध्यक्षांनी हे अतिक्र मण काढण्याची हिंमत दाखविल्यास हा रस्ता थेट मालेगाव रस्त्याला जोडला जाणार आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी दूर होण्याबरोबरच शहर विकासाचा मार्ग देखील मोकळा होणार आहे.साठफुटी रस्ता काही बड्या हस्तींनी अतिक्र मण करून अडविल्यामुळे अक्षरशा शहराचा श्वास दाबून धरला आहे. बायपास रखडल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्र मण काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नगररचना विभाग आणि पालिका प्रशासनाने अतिक्र मण धारकांना मोबदला घेऊन गाशागुंडाळला, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची अशी भूमिका घेत प्रशासनाने अनेकवेळा अल्टिमेटम दिला होता. मात्र अडीच वर्ष उलटूनही पालिका प्रशासनाने अद्याप कारवाई न केल्याने शहरवासियांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.शहरामधून जाणाºया विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावर वाढत्या अपघातामुळे अनेक निष्पापांचे बळी गेल्याने बायपासचा प्रश्न ऐरणीवर आला असून या मागणीसाठी सटाणा वकील संघाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याला तात्पुरता पर्याय म्हणून आता पालिका प्रशासन आणि नगररचना विभागाने साठ फुटीचा मार्ग अवलंबला आहे. वकील संघाच्या इशाºयामुळे पालिका प्रशासनाने अतिक्र मण धारकांच्या अनेक वेळा बैठका घेतल्या.वाढीव चटईक्षेत्र, विकास हस्तांतरण हक्क, आर्थिक मोबदला असे तीन पर्याय अतिक्र मण धारकांपुढे ठेवले या तिनही पर्यायांपैकी एकपर्याय निवडून अतिक्र मण काढून शहरविकासाला हातभार लावा असे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी करून अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशाराही दिला.दरम्यान पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे साठ फुटी रस्त्याचे काम रखडले आहे. हा रस्ता मोकळा न केल्यास मी पालिका प्रशासनाविरु द्ध आंदोलन पुकारू असा इशारा एका माजी आमदारांनी देखील दिला होता. मात्र ना कोणाला आंदोलनाची आठवण राहिला, ना पालिका प्रशासनाने अतिक्र मण हटवण्याची हिंमत दाखवली. पालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून साठ फुटीचा विकास रखडला आहे. परिणामी मार्ग रोखून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे.या रस्त्यावरील वाढत्या अपघातामुळे वेळोवेळी बायपास प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र आता बायपास होईल तेव्हा होईल, साठ फुटी रस्त्याचा मार्ग मोकळा करा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.पं. ध. पाटील नगरात काही बंगल्यांच्या बांधकामांना पालिकेने परवानगी दिल्यामुळे या रस्त्याचा विकास कोर्टकचेरीतच अडकला. कोर्टातही पालिकाप्रशासनावर नामुष्कीची वेळ आली. हे प्रकरण मिटत नाही तोच या रस्त्यावर चौगाव रोड नजीक तेरा जणांनी पक्की बांधकामे करून पूर्णपणे रस्ता आडवला आहे. हा रस्ता नामपूर रोड ते शिवाजीनगर पर्यंत विकिसत करण्यात आला आहे. मात्र या तेरा जणांच्या अतिक्र मणामुळे हा समांतर रस्ता अद्यापही मालेगाव रोडला जोडता आलेला नाही याबाबत अनेक वेळा विविध संघटना तसेच नगरसेवकांनी देखील आवाज उठवून साठ फुटी रस्त्याचा श्वास मोकळा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र राजकीय दबावापुढे पालिका प्रशासनाने वेळोवेळी गुडघे टेकण्याचे काम केल्याचे दिसून येते.