शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

राज्यातील दोन लाख ९९ हजार ४४४ अतिक्रमणे होणार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 17:39 IST

मालेगाव : राज्यातील गावठाणवरील व महापालिका क्षेत्रातील गावठाण गायराण जमिनीवरील निवासी घरांचे अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येत आहेत.

मालेगाव : राज्यातील गावठाणवरील व महापालिका क्षेत्रातील गावठाण गायराण जमिनीवरील निवासी घरांचे अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येत आहेत. राज्यभरातील दोन लाख ९९ हजार ४४४ अतिक्रमणे कायम होणार आहेत. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मालेगाव तालुक्यातील पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात अतिक्रमणे नियमानुकूल प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित होते.मालेगाव तालुक्यातील अतिक्रमणे कायम करण्यासाठी २००४ पासून कागदोपत्री प्रक्रिया सुरू होती. केंद्र व राज्य शासनाने २०२२ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनींवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत ग्रामविकास विभागाने १६ फेब्रुवारी २०१८ ला निर्णय घेतला होता. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील ३४ जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एकूण चार लाख ७३ हजार २४८ अतिक्रमणांची नोंदी संगणकावर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २ लाख ९९ हजार ४४४ अतिक्रमणे १ जानेवारी २०११ पूर्वीची आहेत. ९९ हजार ६१५ अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची कारवाई ग्रामसभेत करून गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रमाणित केल्यानंतर ही अतिक्रमणे नियमनुकूल करण्यात आली आहेत.

टॅग्स :Governmentसरकार