शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

नाशिककरांवर अन्याय होऊ देणार नाही

By admin | Updated: February 2, 2016 23:44 IST

रावसाहेब दानवे : विद्यापीठाचे विभाजन प्रकरणी स्पष्टोक्ती

 नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून आयुष विभाग नागपूरला देण्याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच एकलहरा, वीज निर्मिती संच, अपर वन संरक्षक कार्यालय अशी अनेक कार्यालये नागपूरला स्थलांतरित होण्याचे आपण वृत्तपत्रातच वाचले असून, याबाबत संबंधित मंत्र्यांशी बोलून नाशिककरांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच मराठवाडा व विदर्भ येथील उद्योगासाठी कमी पैशाने वीज देण्याबाबतचाही निर्णय झालेला नाही. मात्र काहींच्या मनात याआधीच भीतीचा गोळा उठल्याने त्याबाबत आपण भाष्य करू शकत नाही. मात्र प्रत्येक निर्णयाला वेगवेगळे कंगोरे असू शकतात. मात्र नाशिकला एक न्याय आणि विदर्भाला दुसरा न्याय, असे होणार नाही. एकलहरा येथील वीज निर्मितीचा एक संच नागपूरला हलविण्याबाबत हालचाली सुरू आहेत. राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर येथे अपर वन संरक्षक कार्यालये आहेत. त्यातील नाशिकचे अपर वनसंरक्षक कार्यालय नागपूरला हलविण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून नागपूरला विद्यापीठ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत त्यांना विचारणा केली असता, यापैकी कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र भविष्यात काय होईल हे आपण सांगू शकत नाही. नाशिकची एकेक कार्यालये नागपूरला हलविण्याचे प्रयत्न सुरू असतील तर आपण संबंधित मंत्र्यांशी बोलू. मात्र नाशिककरांवर अन्याय होऊ देणार नाही. नाशिककरांचा विदर्भ आणि मराठवाड्यावर यातून प्रचंड रोष निर्माण झाल्याचे आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू. नाशिककर आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून आपण काम करू, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते, सुनील बागुल, विजय साने, महेश हिरे, लक्ष्मण सावजी, गोपाळ पाटील, सुरेश पाटील, प्रशांत जाधव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)