शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

बदल्या होतीलच त्यात बदला नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुखासुखी कधीच पार पडल्या नाहीत. अशा बदल्यांबाबत नेहमीच तक्रारी झाल्या आहेत आणि साहजिकच दोष प्रशासनावर ...

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुखासुखी कधीच पार पडल्या नाहीत. अशा बदल्यांबाबत नेहमीच तक्रारी झाल्या आहेत आणि साहजिकच दोष प्रशासनावर फोडण्यात आला आहे. दरवर्षी हा प्रकार घडत असला तरी, प्रशासनाने आपल्या कार्यपद्धतीत बदल केल्याचे ऐकिवात नाही. प्रशासकीय बदल्यांमध्ये खातेप्रमुखांकडून आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्या न करण्याकडे अधिक कल असतो, तर विनंती बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप टाळता येत नाही. यंदादेखील असेच होणार याविषयी शंकाच नाही. परंतु असे असले तरी, यंदाच्या बदल्या पारदर्शीपणे व निष्पक्ष पार पडतील, अशी ग्वाही दिली जात असल्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यालाही यात न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नसावी. परंतु बदलीपात्र असूनही बदलीच्या ठिकाणी हजर न होणे, सोयीसाठी प्रतिनियुक्तीवर नेमणूक करून घेणे, बदली झालीच तर अन्याय झाल्याची भावना ठायी ठायी ठासून भरून घेत त्याचा राग शासकीय कामकाजावर काढणे असे प्रकार होणारच नाहीत याची ग्वाही कर्मचारी व त्यांच्या संघटना देतील काय? त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना त्यात सर्वांना समान न्यायतत्त्वावर नेमणुका दिल्या जाव्यात, बदलीआड कोणाचा बदला घेतला जाऊ नये इतकेच.

- श्याम बागुल