शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
5
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
6
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
7
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
8
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
9
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
10
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
11
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
12
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
13
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
14
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
15
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
16
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
17
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
18
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
19
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
20
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!

मानवकेंद्री विकासासाठी दबाव निर्माण व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:10 IST

समाजातील विकासाची व्याख्या बदलून मानवकेंद्री विकास साधला जाण्याची गरज असून त्यासाठी कामगार आणि शेतकरी यांनी हातात हात घालून आपले प्रश्न सोडविण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र सोशल फोरमच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.२१)विविध वक्त्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे महाराष्ट्र सोशल फोरम : चर्चासंवादात असंघटित घटकांच्या प्रश्नांवर मंथन

नाशिक : समाजातील विकासाची व्याख्या बदलून मानवकेंद्री विकास साधला जाण्याची गरज असून त्यासाठी कामगार आणि शेतकरी यांनी हातात हात घालून आपले प्रश्न सोडविण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र सोशल फोरमच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.२१)विविध वक्त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र सोशल फोरम आयोजित चर्चा संवादाच्या तिसऱ्या दिवशी असंघटित घटकांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. यात स्त्री आणि नव्या युगातील संघर्ष या विषयावर झालेल्या संवादात नीरजा, मनस्विनी लता रवींद्र, अरुणा सबाणे, निशा शिवूरकर, प्रज्ञा दया पवार, वर्षा देशपांडे यांनी भाग घेतला.असंघटित श्रमिकांचे अर्थव्यवस्थेतील स्थान या विषयी एम. ए. पाटील, डी.एल. कराड, विश्वास उटगी, पौर्णिमा चिकरमाने, संजय सिंघवी यांनी विचार मांडले. कामगार कायदे पातळ करून कामगार वर्गाचे अस्तित्व संपवण्याचा सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप यावेळी विविध वक्त्यांनी त्यांचे विचार मांडताना केला. तर उध्वस्त शेती - उध्वस्त अर्थव्यवस्था व पुढील आव्हाने याविषयी भालचंद्र कांगो यांनी मानव केंद्री विकास करण्याची गरज व्यक्त केली.महाराष्ट सोशल फोरमने समान विकासाचा कार्यक्रम ठरवून तो अमलात आणण्यासाठी सरकारवर दबाव आणावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी भूमिका मांडली. अशोक ढवळे यांनी शेतीचे कर्पोरेटिकरण केंद्र सरकार करू पाहतेय ते हाणून पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सुशीला मोराळे यांनी शेतकरी महिलांच्या आरोग्याच्याचे प्रश्न गंभीर असल्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. कामगार नेते शशांक राव यांनी शेतकरी जगला तर देश जगेल, अशी भूमिका मांडली.प्रश्न तडीस नेण्यासाठी एकत्र येणे गरजेचेया चर्चासत्रात महिलांचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून त्यावर सर्वांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याची गरज सर्व वक्त्यांनी मांडली. त्याचपरमाणे आदिवासी, भटके विमुक्त आणि उपेक्षितांची आंदोलनं याविषयावर सुरेखा दळवी, वाहरु सोनवणे, धनाजी गुरव, लक्ष्मण माने, मंगेश भारसाखळे, अजित शिंदे यांनी विचार मांडले. चळवळींनी या घटकांच्या प्रशनांनाना अग्रक्रम द्यावा अशी सर्व वक्त्यांनी मांडणी केली.दबाव निर्माण व्हावाकामगार आणि शेतकरी यांनी हातात हात घालून आपले प्रश्न दबाव निर्माण करून सोडवले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यभरातील एक हजाराहून जास्त संस्था संघटना , श्रमिक, मजूर संघटना आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमात तिसºया दिवशी सहभाग घेतला होता.

टॅग्स :cultureसांस्कृतिक