शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

मानवकेंद्री विकासासाठी दबाव निर्माण व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:10 IST

समाजातील विकासाची व्याख्या बदलून मानवकेंद्री विकास साधला जाण्याची गरज असून त्यासाठी कामगार आणि शेतकरी यांनी हातात हात घालून आपले प्रश्न सोडविण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र सोशल फोरमच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.२१)विविध वक्त्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे महाराष्ट्र सोशल फोरम : चर्चासंवादात असंघटित घटकांच्या प्रश्नांवर मंथन

नाशिक : समाजातील विकासाची व्याख्या बदलून मानवकेंद्री विकास साधला जाण्याची गरज असून त्यासाठी कामगार आणि शेतकरी यांनी हातात हात घालून आपले प्रश्न सोडविण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र सोशल फोरमच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.२१)विविध वक्त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र सोशल फोरम आयोजित चर्चा संवादाच्या तिसऱ्या दिवशी असंघटित घटकांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. यात स्त्री आणि नव्या युगातील संघर्ष या विषयावर झालेल्या संवादात नीरजा, मनस्विनी लता रवींद्र, अरुणा सबाणे, निशा शिवूरकर, प्रज्ञा दया पवार, वर्षा देशपांडे यांनी भाग घेतला.असंघटित श्रमिकांचे अर्थव्यवस्थेतील स्थान या विषयी एम. ए. पाटील, डी.एल. कराड, विश्वास उटगी, पौर्णिमा चिकरमाने, संजय सिंघवी यांनी विचार मांडले. कामगार कायदे पातळ करून कामगार वर्गाचे अस्तित्व संपवण्याचा सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप यावेळी विविध वक्त्यांनी त्यांचे विचार मांडताना केला. तर उध्वस्त शेती - उध्वस्त अर्थव्यवस्था व पुढील आव्हाने याविषयी भालचंद्र कांगो यांनी मानव केंद्री विकास करण्याची गरज व्यक्त केली.महाराष्ट सोशल फोरमने समान विकासाचा कार्यक्रम ठरवून तो अमलात आणण्यासाठी सरकारवर दबाव आणावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी भूमिका मांडली. अशोक ढवळे यांनी शेतीचे कर्पोरेटिकरण केंद्र सरकार करू पाहतेय ते हाणून पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सुशीला मोराळे यांनी शेतकरी महिलांच्या आरोग्याच्याचे प्रश्न गंभीर असल्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. कामगार नेते शशांक राव यांनी शेतकरी जगला तर देश जगेल, अशी भूमिका मांडली.प्रश्न तडीस नेण्यासाठी एकत्र येणे गरजेचेया चर्चासत्रात महिलांचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून त्यावर सर्वांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याची गरज सर्व वक्त्यांनी मांडली. त्याचपरमाणे आदिवासी, भटके विमुक्त आणि उपेक्षितांची आंदोलनं याविषयावर सुरेखा दळवी, वाहरु सोनवणे, धनाजी गुरव, लक्ष्मण माने, मंगेश भारसाखळे, अजित शिंदे यांनी विचार मांडले. चळवळींनी या घटकांच्या प्रशनांनाना अग्रक्रम द्यावा अशी सर्व वक्त्यांनी मांडणी केली.दबाव निर्माण व्हावाकामगार आणि शेतकरी यांनी हातात हात घालून आपले प्रश्न दबाव निर्माण करून सोडवले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यभरातील एक हजाराहून जास्त संस्था संघटना , श्रमिक, मजूर संघटना आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमात तिसºया दिवशी सहभाग घेतला होता.

टॅग्स :cultureसांस्कृतिक