शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मानवकेंद्री विकासासाठी दबाव निर्माण व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:10 IST

समाजातील विकासाची व्याख्या बदलून मानवकेंद्री विकास साधला जाण्याची गरज असून त्यासाठी कामगार आणि शेतकरी यांनी हातात हात घालून आपले प्रश्न सोडविण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र सोशल फोरमच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.२१)विविध वक्त्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे महाराष्ट्र सोशल फोरम : चर्चासंवादात असंघटित घटकांच्या प्रश्नांवर मंथन

नाशिक : समाजातील विकासाची व्याख्या बदलून मानवकेंद्री विकास साधला जाण्याची गरज असून त्यासाठी कामगार आणि शेतकरी यांनी हातात हात घालून आपले प्रश्न सोडविण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र सोशल फोरमच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.२१)विविध वक्त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र सोशल फोरम आयोजित चर्चा संवादाच्या तिसऱ्या दिवशी असंघटित घटकांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. यात स्त्री आणि नव्या युगातील संघर्ष या विषयावर झालेल्या संवादात नीरजा, मनस्विनी लता रवींद्र, अरुणा सबाणे, निशा शिवूरकर, प्रज्ञा दया पवार, वर्षा देशपांडे यांनी भाग घेतला.असंघटित श्रमिकांचे अर्थव्यवस्थेतील स्थान या विषयी एम. ए. पाटील, डी.एल. कराड, विश्वास उटगी, पौर्णिमा चिकरमाने, संजय सिंघवी यांनी विचार मांडले. कामगार कायदे पातळ करून कामगार वर्गाचे अस्तित्व संपवण्याचा सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप यावेळी विविध वक्त्यांनी त्यांचे विचार मांडताना केला. तर उध्वस्त शेती - उध्वस्त अर्थव्यवस्था व पुढील आव्हाने याविषयी भालचंद्र कांगो यांनी मानव केंद्री विकास करण्याची गरज व्यक्त केली.महाराष्ट सोशल फोरमने समान विकासाचा कार्यक्रम ठरवून तो अमलात आणण्यासाठी सरकारवर दबाव आणावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी भूमिका मांडली. अशोक ढवळे यांनी शेतीचे कर्पोरेटिकरण केंद्र सरकार करू पाहतेय ते हाणून पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सुशीला मोराळे यांनी शेतकरी महिलांच्या आरोग्याच्याचे प्रश्न गंभीर असल्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. कामगार नेते शशांक राव यांनी शेतकरी जगला तर देश जगेल, अशी भूमिका मांडली.प्रश्न तडीस नेण्यासाठी एकत्र येणे गरजेचेया चर्चासत्रात महिलांचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून त्यावर सर्वांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याची गरज सर्व वक्त्यांनी मांडली. त्याचपरमाणे आदिवासी, भटके विमुक्त आणि उपेक्षितांची आंदोलनं याविषयावर सुरेखा दळवी, वाहरु सोनवणे, धनाजी गुरव, लक्ष्मण माने, मंगेश भारसाखळे, अजित शिंदे यांनी विचार मांडले. चळवळींनी या घटकांच्या प्रशनांनाना अग्रक्रम द्यावा अशी सर्व वक्त्यांनी मांडणी केली.दबाव निर्माण व्हावाकामगार आणि शेतकरी यांनी हातात हात घालून आपले प्रश्न दबाव निर्माण करून सोडवले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यभरातील एक हजाराहून जास्त संस्था संघटना , श्रमिक, मजूर संघटना आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमात तिसºया दिवशी सहभाग घेतला होता.

टॅग्स :cultureसांस्कृतिक