शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

आर्थिक निकषावर आरक्षण असावे

By admin | Updated: September 25, 2016 01:44 IST

उदयनराजे भोसले यांची मागणी

नाशिक : मराठेतर आरक्षणामुळे समाजात मोठी दुही निर्माण झाली असून, त्यामुळे सामाजिक समता राहिलेली नाही. या विषमतेचा फटका मराठा समाजातील तरुण पिढीला बसला आहे. कुणाच्याही आरक्षणाला आमचा विरोध नाही तर इतर समाजाचीही सामाजिक प्रगती झाली पाहिजे. मात्र जातीनिहाय आरक्षण न देता आर्थिक निकषांवर आधारीत आरक्षण असले पाहिजे असे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विशेष अधिवेशन बोलविले पाहिजे, अशी भूमिकाही मांडली. नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चासाठी उपस्थित असलेले उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारची धोरणे आणि सर्वच पक्षांच्या नेत्यांवर तोफ डागली. छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित स्वराज्य अद्यापही मिळाले नसून यास निष्क्रिय सरकारे जबाबदार आहेत. सरकार कोणत्याही पक्षाचे असो त्यांची मानसिकता केवळ मराठा समाजाला वापरून घेण्याचीच असल्याचे भोसले म्हणाले. भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेत ‘समानता’ हा एक मुद्दा आहे, परंतु ही समानता खरेच आहे का? आरक्षणाला आमचा विरोध नाही, समाजातील उपेक्षित घटकाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षण हे जातीवर नव्हे तर आर्थिक निकषांवर मिळायला हवे, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.मराठेतर आरक्षणामुळे मराठा समाजातील तरुणांना शिक्षण आणि तरुणांना नोकरीत न्याय मिळत नाही, ही चीड त्यांच्या मनात आहे. कालची जी परिस्थिती होती ती आज नाही, त्यामुळे आरक्षण रचनेचे पुनर्विचार करायला हवा. मराठा समाजाचा विचार कोणताही पक्ष करीत नाही, त्याप्रमाणेच मराठा समाजातील प्रस्थापितांनी विस्थापित मराठा तयार केले, असा आरोपही उदयनराजे यांनी केला. मराठा समाज हा आरक्षणाची भीक मागणार नाही, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्य सरकारने जीएसटीप्रमाणे विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा होणाऱ्या परिणामांना राज्य आणि केंद्र या दोघांनाही सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मराठा तरुणांमध्ये प्रसंगी नक्षलीप्रमाणे चळवळ उभी राहिल प्रसंगी आपण या चळवळीचे नेतृत्वही करू असेही उदयनराजे म्हणाले.तर घटनेत बदल कराअ‍ॅट्रॉसिटी कायद्यामुळे मराठा तरुणांवर अन्याय होत आहे. अनेकांवर खोट्या केसेसे असून यात बदल झाला पाहिजे. ज्या काळात हा कायदा झाला त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. काळानुरूप समाज बदलत असल्याने काद्यातही बदल होणे अपेक्षित आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल होऊ शकत नसतील तर घटनेतील तरतुदीत बदल करा, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.आरोपीस गोळ्या घाला४कोपर्डी प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी भर चौकात जनतेसमोर फाशी दिली पाहिजे किंवा त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे सांगून सरकारला हे जमणार नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्या, बघा आम्ही काय करतो, असेही उदयनराजे म्हणाले.