शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेपुढे शहाणपण नसते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:14 IST

नाशिक : गृहमंत्री अनिल देशमुख् यांच्यावर झालेले आरोप सनसनाटी आणि खळबळजनक आहेत. त्यामुळे त्यातील सत्यतेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ...

नाशिक : गृहमंत्री अनिल देशमुख् यांच्यावर झालेले आरोप सनसनाटी आणि खळबळजनक आहेत. त्यामुळे त्यातील सत्यतेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा चांगली राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, या संपूर्ण प्रकरणात काही गोष्टींवर योग्यवेळी निर्णय घेणे अपेक्षित होते. सत्तेपुढे शहाणपण नसते, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी लेटरबॉम्ब प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

शनिवारी नाशिकला आलेल्या खासदार राऊत यांनी रविवारी सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना हे विधान केले. गृहमंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप होणे हे खरोखरच दुर्दैवी आहे. ज्यांनी हे सरकार यावं, यासाठी खारीचा वाटा उचलला, अशा आमच्या सारख्यांसाठी हे धक्कादायकच आहे. त्यामुळे सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपले पाय जमिनीवर आहेत का हे प्रत्येकाने तपासले पाहिजे. आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त असून त्यांच्या पूर्वीच्या कामाबद्दल नक्कीच कौतुक आहे. मात्र, त्यांच्या पत्रावर तपास करावा असे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. योग्य तो निर्णय घेण्याची भूमिका पवार पार पाडतील. मात्र, विरोधी पक्षाने मागणी केल्यानुसार सरकार चालत नसते, असेही राऊत यांनी नमूद केले.

इन्फो

सरकारवर शिंतोडे उडाल्याचे मान्य

माझी या संपूर्ण प्रकरणात कोणतीही वैयक्तिक भूमिका नाही. मात्र, पोलीस प्रशासन हा कोणत्याही सरकारचा कणा असतो. आमची राजवटदेखील उत्तम चालली आहे, मात्र, काहीतरी दुरुस्ती करावी लागणार आहे. या संपूर्ण प्रकारणात सरकारवर शिंतोडे उडाले हे मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा माझ्याकडे आहे. त्या असेही राऊत यांनी नमूद केले.