शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

म्हणे जीविताला धोका दिसत नाही!

By admin | Updated: March 22, 2015 23:27 IST

पोलिसांचा अजब शोध : तहसीलदारास अग्निशस्त्र देण्यास नकार

नाशिक : नांदगाव, येवला पाठोपाठ देवळा येथेही प्रांत अधिकाऱ्यावर वाळूमाफियांनी हल्ला चढवून त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडविल्याने समस्त महसूल यंत्रणा जिवाच्या भीतीने धास्तावली असताना, अशा माफियांपासून स्वत:च्या संरक्षणासाठी अग्निशस्त्राचा परवाना मागण्यासाठी गेलेल्या तहसीलदाराला जीवाची भीती नसल्याचा जावई शोध लावून पोलीस यंत्रणेने परवाना नाकारल्याची बाब उघडकीस आली आहे. तहसीलदारांवर यापूर्वी जिवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झालेला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून परवाना नाकारण्याची बाब म्हणजे वाळूमाफियांना मोकळीक देण्याचीच पोलिसांची कृती असल्याचा अर्थ त्यातून काढला जात आहे. पोलीस यंत्रणेने अग्निशस्त्र नाकारल्याच्या घटनेची महसूल अधिकारी संघटनेने गंभीर दखल घेऊन या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार तर केलीच, पण शासनाच्या निदर्शनास सदरहू बाब आणून देतानाच, पोलीस आयुक्तांच्या परवाना नाकारण्याच्या निर्णयाविरुद्ध थेट गृहखात्याकडे अपील करण्याचाही निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाळूमाफियांनी गुंडगिरीचे प्रदर्शन करीत महसूल यंत्रणेला वेठीस धरले असताना हा प्रकार घडला आहे. नाशिकच्या तहसीलदारांनी पोलीस आयुक्त कार्यालयात अग्निशस्त्र म्हणजेच रिव्हॉल्व्हर बाळगण्याचा परवाना मिळण्यासाठी रितसर अर्ज केला होता. बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन, वाळूची वाहतूक, शासकीय वसुली, मंत्र्यांचा राजशिष्टाचार अशा विविध घटनांना सामोरे जात असताना बऱ्याच वेळी संबंधितांकडून दमदाटी, धमक्या व अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत असल्याने स्वसंरक्षणासाठी अग्निशस्त्र परवाना मिळावा, अशी विनंती त्यांनी अर्जात केली होती. त्यावर पोलीस आयुक्तालयाने तहसीलदार राहत असलेल्या भागातील संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारींकडून तसा अहवाल मागवून खरोखरच तहसीलदारांच्या जीविताला धोका आहे काय याची विचारणा केली. मात्र तहसीलदार ज्या ठिकाणी राहतात, त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या जीविताला धोका असल्याचा कोणताही पुरावा संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारींना आढळून न आल्याने त्यांनी तसे पोलीस आयुक्तांना कळविले. याचाच धागा पकडून पोलीस आयुक्तालयाने नाशिक तहसीलदारांना अग्निशस्त्र परवाना देता येत नसल्याचे कळवितानाच, ‘तुमच्या जीविताला धोका दिसत नाही’ अशी टिप्पणी केली आहे. जीविताला धोका नसल्याचे कारण पुढे करून तहसीलदाराला अग्निशस्त्र परवाना नाकारण्याच्या पोलिसांच्या या कृतीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून, शहरात यापूर्वी अदा करण्यात आलेले सारे परवाने संबंधित व्यक्तीच्या जीविताला धोका आहे किंवा नाही याचा पोलिसांनी शोध घेऊनच दिले काय असा सवाल केला जात आहे.