शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

खोटं बोलल्याशिवाय राजकारण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:33 IST

नाशिक : राजकारण एकप्रकारचे नाटक असून, येथे राजकीय नेत्यांना सतत अभिनय करावा लागतो. अनेकदा मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी खोटंही बोलावं लागतं. खोटं बोलल्याशिवाय राजकारण चालूच शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देगुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

नाशिक : राजकारण एकप्रकारचे नाटक असून, येथे राजकीय नेत्यांना सतत अभिनय करावा लागतो. अनेकदा मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी खोटंही बोलावं लागतं. खोटं बोलल्याशिवाय राजकारण चालूच शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.राज्यात सध्या निवडणुकांमुळे राजकिय वातावरण तापले आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अच्छे दिनच्या प्रचाराविषयी देखील असे काही नसल्याचे सांगून वाद ओढावला होता. आता मतदारांची फसवणूक करत असल्याचे राज्यमंत्र्यांनी जाहिर कार्यक्रमात सांगितल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.शनिवारी (दि.२) श्री राजे छत्रपती मंडळातर्फे पाटील यांच्या हस्ते २५ जणांना जीवनगौरव व २६ जणांना गोदागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेसह अन्य सहकारी संस्थांची दुरवस्था झाली असून, एनपीए ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सहकारी संस्थांनी कामगिरीत सुधारणा करण्याचा सल्ला त्यांनी दिला. गुलाबराव पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना करावी लागणारी कसरत उपस्थिताना सांगताना राजकारणात खोटं बोलून मतदारांची मर्जी सांभाळावी लागत असल्याची खंत बोलून दाखवली. खरे बोलले तर नागरिकही राजकीय व्यक्तींवर विश्वास ठेवत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.