शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

खोटं बोलल्याशिवाय राजकारण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:33 IST

नाशिक : राजकारण एकप्रकारचे नाटक असून, येथे राजकीय नेत्यांना सतत अभिनय करावा लागतो. अनेकदा मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी खोटंही बोलावं लागतं. खोटं बोलल्याशिवाय राजकारण चालूच शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देगुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

नाशिक : राजकारण एकप्रकारचे नाटक असून, येथे राजकीय नेत्यांना सतत अभिनय करावा लागतो. अनेकदा मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी खोटंही बोलावं लागतं. खोटं बोलल्याशिवाय राजकारण चालूच शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.राज्यात सध्या निवडणुकांमुळे राजकिय वातावरण तापले आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अच्छे दिनच्या प्रचाराविषयी देखील असे काही नसल्याचे सांगून वाद ओढावला होता. आता मतदारांची फसवणूक करत असल्याचे राज्यमंत्र्यांनी जाहिर कार्यक्रमात सांगितल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.शनिवारी (दि.२) श्री राजे छत्रपती मंडळातर्फे पाटील यांच्या हस्ते २५ जणांना जीवनगौरव व २६ जणांना गोदागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेसह अन्य सहकारी संस्थांची दुरवस्था झाली असून, एनपीए ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सहकारी संस्थांनी कामगिरीत सुधारणा करण्याचा सल्ला त्यांनी दिला. गुलाबराव पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना करावी लागणारी कसरत उपस्थिताना सांगताना राजकारणात खोटं बोलून मतदारांची मर्जी सांभाळावी लागत असल्याची खंत बोलून दाखवली. खरे बोलले तर नागरिकही राजकीय व्यक्तींवर विश्वास ठेवत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.