शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

पालखेडचे पाणी न मिळाल्याने संताप

By admin | Updated: May 11, 2017 00:36 IST

येवला : पालखेडच्या आवर्तनातून कोळगंगा नदीवरील सर्व बंधारे भरणे आवश्यक असताना ते न भरल्याने या गावांतून संताप व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : पालखेडच्या आवर्तनातून तालुक्याच्या पूर्व भागातील १३ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोळगंगा नदीवरील सर्व बंधारे भरणे आवश्यक असताना ते न भरल्याने या गावांतून संताप व्यक्त होत आहे. निफाड तालुक्यापासून पश्चिमेला डोंगळ्यांद्वारे पाणी मिळाले; परंतु येवल्याला आरक्षण रद्दच्या कागदी बागुलबुवाने उपोषण, रास्ता रोको करूनही हक्काचे पाणी न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालखेड धरणात पाणीसाठा उपलब्ध नव्हता; मात्र यंदाच्या परिस्थितीत पालखेड धरणात १.५० दलघमी (८.१२ टक्के), करंजवण ४५.८० दलघमी (३०.१२ टक्के), तर वाघाडमध्ये ८३४५ दलघमी (१२.८५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असतानादेखील पाणी तालुक्याच्या पूर्व भागाला मिळाले नसल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी तीव्र दुष्काळाचा अपवादवगळता पालखेडचे आवर्तन गेल्या ३६ वर्षांपासून दिले जाते. परंतु यंदा बोकटे, अंदरसूलसह पूर्व भागातील १३ गावांनी पाण्यासाठी टाहो फोडला. सुमारे ३०० ग्रामस्थांनी यासाठी उपोषण केले. थेट मुंबईला पालकमंत्र्यांकडे येवल्याचे शिष्टमंडळ गेले. तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी द्यावे यासाठी बोकटे, देवळाणे, दुगलगाव, अंदरसूल यांसह पंचक्रोशीतील दहा गावांच्या ग्रामपंचायतींनी पाणी मागणी संबंधीचा ठराव करून, ३६ वर्षांपासून परिसरातील सर्व बंधारे पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनाने भरून देण्याची परंपरा कायम ठेवून प्रासंगिक आरक्षणाचे पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनाने पाणी द्यावे या मागणीसाठी केलेल्या उपोषणाला तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनीही समर्थन दिले होते. आवर्तनातून कोळगंगा नदीच्या परिसरातील लहान-मोठे बंधारे भरून द्यावे यासाठी अंदरसूल येथे नाशिक-औरंगाबाद महामार्गावर शनिवारी रणरणत्या उन्हात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करून घेतली तरीही प्रश्न सुटला नाही. आरक्षणच रद्द केल्याने १३ गावांच्या ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.पालखेडच्या पाण्याबाबत दुजाभावजिल्हाधिकाऱ्यांनी २५ आॅक्टोबर २०१६ रोजी पाणीटंचाईग्रस्त गावांची नावे जाहीर केली. यावेळी येवला तालुक्यातील पूर्व भागातील १३ गावे पालखेडच्या पाण्याच्या प्रासंगिक आरक्षणातून वगळण्यात आली. येवला तहसील कार्यालयाने २६ आॅक्टोबर २०१६ला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल पाठविला. तालुक्यातील १३ गावे प्रासंगिक आरक्षणातून बाद झाली. या अन्यायला तहसीलदार, गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संभाजीराजे पवार, मकरंद सोनवणे, झुंजार देशमुख, अरुण काळे, आकाश सोनवणे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त महेश झगडे यांची भेट घेऊन केला. यावेळी पालखेड पाण्याच्या बाबतीत येवला तालुक्यावर झालेल्या अन्यायाबाबत चर्चा केली. आयुक्तांना याबाबत निवेदनही दिले. पालखेड कालव्यामार्फत ३६ वर्षांपासून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातून कोळगंगा नदीवरील बंधारे भरून दिले जात होते. यावर्षी मात्र प्रशासनाने जाणीवपूर्वक कोळगंगेसहित १३ गावांचे पाणी आरक्षण रद्द केले. यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळेच या गावांना आरक्षणामधून वगळण्यात आल्याचा आरोप पूर्व भागातील १३ गावांच्या ग्रामस्थांनी केला आहे. केवळ २०० दलघफू पाणी दिले गेले.कालवा सल्लागार समितीतील पाणी नियोजन आणि जिल्हाधिकाऱ्यांद्वारा होणारे पाणी आरक्षण यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. राजकीय धुरिणांनी केवळ आंदोलने करण्यापेक्षा अभ्यासपूर्ण पाणी नियोजन मांडणी करण्याचे कसब दाखवावे. पालखेडचे पाणी वितरण आणि आरक्षण व विभागाकडून मांडली जाणारी फसवी आकडेवारीविरुद्ध तालुक्याला न्याय मिळवून देण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जाणकार पाणीतज्ज्ञ करीत आहेत.