शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

निवृत्तिनाथांची वारी झाली लाखाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:14 IST

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीत सहभागी वारकऱ्यांच्या संख्येने यंदा प्रथमच एक लाखाचा टप्पा ओलांडत सव्वा लाखांहून अधिक वारकऱ्यांपर्यंत मजल मारली आहे. अजून अखेरचे दोन मुक्काम बाकी असून, गावोगावच्या दिंडींमधील वाढते प्रमाण पाहता पंढरीत पोहोचेपर्यंत वारकºयांची ही मांदीयाळी दीड लाखांपर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देलक्षणीय सहभाग : दुष्काळी स्थितीतही पावले चालती पंढरीची वाट

धनंजय रिसोडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीत सहभागी वारकऱ्यांच्या संख्येने यंदा प्रथमच एक लाखाचा टप्पा ओलांडत सव्वा लाखांहून अधिक वारकऱ्यांपर्यंत मजल मारली आहे. अजून अखेरचे दोन मुक्काम बाकी असून, गावोगावच्या दिंडींमधील वाढते प्रमाण पाहता पंढरीत पोहोचेपर्यंत वारकºयांची ही मांदीयाळी दीड लाखांपर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत.ज्ञानोबा माउलींचे ज्येष्ठ बंधू आणि गुरू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांच्या पालखीलादेखील माउली आणि तुकोबामहाराजांच्या पालखीइतकाच मान आहे. या दोन पालख्यांमध्ये वर्षानुवर्ष सहभागी होणाºया वारकºयांची संख्या ४ ते ५ लाखांच्या घरात असते. मात्र, त्र्यंबकेश्वरच्या समाधी स्थानापासून निघणारी निवृत्तिनाथ महाराजांची पालखी अधिक लांबून पंढरीत जात असूनदेखील या पालखीत सहभागी वारकºयांची संख्या कधी एक लाखाच्या पल्याड पोहोचली नव्हती. पण यंदा मात्र पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेपर्यंतच सव्वा लाखाच्या वर पोहोचली आहे. पंढरपूरपर्यंत ही संख्या यंदा दीड लाखावर पोहोचण्याची शक्यता आहे.‘निर्मल वारी’ अशक्यमाउली आणि तुकोबांच्या पालखीसह निवृत्तिनाथ महाराज आणि सोपानकाका पालखी यादेखील शतकानुशतके चालणाºया पालख्यांची शासनदरबारी नोंद आहे. या दोन पालख्यांसमवेत शासनाकडून अनेक मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी ही सुविधा असल्याने त्या पालखीत सहभागी वारकºयांना ‘निर्मल वारी’ करणे शक्य होत आहे. मात्र, निवृत्तिनाथ पालखीसमवेत मोबाइल टॉयलेटच्या व्यवस्थेचे अभाव असल्याने त्यांना ‘निर्मल वारी’ संभव होऊ शकलेली नाही.‘हरित वारी’ साधलीराज्य शासनाच्या निर्देशानुसार निवृत्तिनाथ पालखीचे सर्व मानकरी आणि मंदिराचे विश्वस्त ही वारी हरित व्हावी, यासाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पाच रोपांचे वृक्षारोपण तसेच सीडबॉलचे वाटप करीत पुढे जात आहेत. त्यामुळे वारी खºया अर्थाने ‘हरित वारी’ करण्याचे नियोजन योग्यप्रकारे साध्य केले जात आहेत.त्र्यंबकपासून निघताना तीस हजारत्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधी मंदिरापासून ही पालखी निघते, त्यावेळी त्यात सहभागी आसपासच्या गावांमधील दिंड्यांमधील वारकरी संख्या ही तीस हजारांच्या आसपास असते. नाशिकपर्यंत त्यात अजून काही दिंड्या सहभागी झाल्याने ती संख्या चाळीस हजारावर जाते. त्यात पुढे-पुढे जात ही संख्या गतवर्षीपर्यंत ८० हजारांपर्यंत जात होती.युवा वारकºयांमध्ये भरघोस वाढयंदाच्या वारीत संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ पालखीत सहभागी वारकºयांची संख्या प्रथमच सव्वा लाखावर पोहोचली आहे. पाऊस लांबल्याने या बहुतांश भागातील पेरण्यादेखील लांबल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी थांबण्याऐवजी शेतकरी आणि युवावर्ग सहभागी होण्याचे प्रमाण यंदा मोठ्या प्रमाणात वाढले आहे.- पुंडलिक थेटेनिवृत्तिनाथ पालखी समन्वयक