शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खात्यातून परत गेलेले पैसे पुन्हा आल्याच्या खात्रीबाबत साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:07 IST

नाशिक : वार्षिक सहा हजार रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणाºया पंतप्रधान किसान योजनेच्या पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर अवघ्या काही वेळातच पुन्हा परत काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाविषयी शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या शेतकºयांच्या खात्यावर पुन्हा पैसे जमा झाले किंवा नाही याची खात्री करण्याची कोणतीही यंत्रणा स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने सरकारची घोषणा चुनावी जुमला ठरण्याची टीका होऊ लागली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान किसान योजना : प्रशासनाकडूनही शेतकऱ्यांची दिशाभूल

नाशिक : वार्षिक सहा हजार रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणाºया पंतप्रधान किसान योजनेच्या पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर अवघ्या काही वेळातच पुन्हा परत काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाविषयी शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या शेतकºयांच्या खात्यावर पुन्हा पैसे जमा झाले किंवा नाही याची खात्री करण्याची कोणतीही यंत्रणा स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने सरकारची घोषणा चुनावी जुमला ठरण्याची टीका होऊ लागली आहे. योजनेबाबत शेतकºयांच्या तक्र्रारी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे करण्यात आलेले आवाहन दिशाभूल करणारे ठरले आहे. (पान ४ वर) वारंवार संपर्क करूनही या योजनेबाबत माहिती देण्यास जिल्हाधिकारी कार्यालयात कोणीही सक्षम अधिकारी समोर आला नाही. (पान ? वर)२४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान योजनेचा पहिला हप्ता शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचा शुभारंभ केला. दोन हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेल्या शेतकºयांची संख्या नाशिक जिल्ह्णात सुमारे साडेतीन लाखांच्या आसपास असून, त्यातील पहिल्या टप्प्यात काही शेतकºयांच्या खात्यावर दोन हजार रुपये त्याच दिवशी जमा झाले, तसे लघुसंदेशही संबंधित बॅँकांकडून शेतकºयांना देण्यात आले. परंतु जिल्ह्णातील १८६ शेतकºयांच्या खात्यावर जमा झालेले पैसे अवघ्या काही वेळातच बॅँकांनी पुन्हा परत घेऊन आपल्याकडे जमा करून घेतले. याबाबत शेतकºयांनी बॅँकांना विचारणा केली असता बॅँकांनी हातवर करून सदरचे पैसे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाकडे बोट दाखवून हात झटकले. कृषी विभागाकडेदेखील याची काही माहिती नाही तर महसूल खात्यानेही याबाबत माहिती नसल्याचे सांगून आपली मान सोडवून घेतली. ज्या शेतकºयांच्या खात्यातील पैसे परत काढण्यात आले अशा शेतकºयांची नावे, बॅँकेचे खाते क्रमांक, आधार क्रमांक याची खात्री पुन्हा स्थानिक पातळीवरून करण्यात आल्यानंतर जवळपास १२२ शेतकºयांची माहिती पुन्हा आॅनलाइन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाकडे पाठविण्यात आली आहे. परंतु या शेतकºयांना पैसे मिळाले की नाही याची खात्री करण्याची कोणतीही सोय स्थानिक पातळीवर उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकºयांकडून या योजनेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. खात्यात जमा झालेले पैसे पुन्हा काढून घेतलेले अशोक लहामगे या शेतकºयाशी संपर्क साधला असता त्यांना अद्यापही पैसे मिळालेले नसल्याचे सांगण्यात आले.गॅस सबसिडीबाबत दिलगिरीघरगुती गॅस सिलिंडरची बॅँक खात्यात जमा होणारी रक्कम पंतप्रधान किसान योजनेंतर्गत दाखविण्याचा प्रताप सरकारने केला असून, गेल्या आठवड्यात गॅस ग्राहकाच्या १११५१२८ कॅशमेमोधारकाच्या खात्यावर जमा झालेले १५५.९५ रुपये बॅँक खात्यात जमा करताना चक्क पंतप्रधान किसान योजनेंतर्गत दाखविण्यात आले होते. सरकार शेतकºयांना दोन हजार रुपये देत असताना गॅस ग्राहकाला फक्त १५५ रुपयेच जमा झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले. या संदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच, बॅँकेने दुसºया दिवशी लघुसंदेशाद्वारे दिलगिरी व्यक्त करून सदरचे पैसे किसान योजनेचे नसल्याचा खुलासा केला आहे.