शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

गैरसोय होतेय... पण बोलणार कोण?

By admin | Updated: October 9, 2014 01:10 IST

गैरसोय होतेय... पण बोलणार कोण?

त्र्यंबकेश्वर : पुढच्या वर्षी अवघ्या ८ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त वर्षभरात करोडो भाविक येऊन जाणार आहेत. त्यांच्यासाठी व शहरातील नागरिकांच्या कायमस्वरूपी विकासासाठी सध्या शहरात विविध कामे सुरू आहेत. तथापि, या कामांमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एवढी गैरसोय सहन करूनही सर्व निमूटपणे सोसावे लागत आहे. कारण बोलणार कोण?शहरात सिंहस्थाची अनेक कामे चालू आहेत. त्यात भूमिगत जलवाहिन्या टाकणे, विद्युत तारा (भूमिगत), टेलिफोन लाइन ही सर्व कामे झाल्यानंतर नगरपालिकेतर्फे सीमेंट कॉँक्रिटीकरण, रस्त्याची कामे सुरू होतील. याशिवाय विद्युत पोल उभे करणे आणि ही सर्व कामे रस्त्यावर-रस्त्याच्या कडेला होत असल्याने स्थानिक रहिवाशांना मशीनचा खडखडाट, रस्तेच बंद झाल्याने जाण्या-येण्यास त्रास होत असतो. रात्रीच्या वेळी विद्युत प्रवाह खंडित झाल्यावर ठेचा खात चालणे, ठेचकाळणे, कधी कधी साष्टांग दंडवत करण्याची वेळ येणे, आपली स्वत:ची वाहने घर एकीकडे, तर वाहने दुसरीकडे लावावी लागतात. त्यातही विजेची कामे सुरू असल्याने वीज केव्हाही खंडित होणे असे प्रकार वारंवार घडत असतात. शिवाय शौचालय बांधकाम, शेड बांधकाम, रस्त्यासाठी वाळूचे ट्रक, विटा वाहतूक, सिमेंट-खडी आदिंसाठी ट्रकच शहरातील वावर पर्यायाने सर्वत्र धूळ उडत असते. असे प्रकार घडत आहेत व यापुढेही कामे पूर्ण होईपर्यंत घडणार आहे. ही सर्व गैरसोय, होणारा त्रास सहन करूनही कोणाचीही ब्र काढण्याची हिंमत नाही. कारण सर्व कामे होणे गरजेचे आहे. (वार्ताहर)