शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्ह्यात सध्यातरी लॉकडाऊन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:42 IST

नाशिक: जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या वाढत असली तरी सध्यातरी नाशिकमध्ये लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता नाही. परंतु नागरिकांनी ...

नाशिक: जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या वाढत असली तरी सध्यातरी नाशिकमध्ये लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता नाही. परंतु नागरिकांनी खबरदारी घेतली नाही तर लॉकडाऊनचा पुन्हा विचार करावा लागेल असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरेानाचा संसर्ग वाढत असल्याने दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने काळजी घेतली गेली पाहिजे असेही भुजबळ म्हणाले.

शिवजयंती उत्सवानिमित्ताने नाशिक दौऱ्यावर असलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीविषयी विचारले असता त्यांनी तूर्तास नाशिकला लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचे सांगितले. यावेळी भुजबळ यांनी सांगितले की, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झालेली असल्याने काही ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आलेली आहे. नाशिक जिल्ह्यासंदर्भात अद्याप लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला नाही. वास्तविक लॉकडाऊन करणे नागरिक आणि शासनाला देखील परवडणारे नाही. दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहणे गरजेचे आहे. रूग्णसंख्येमध्ये वाढ होत गेल्यास मात्र लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा विचार करावा लागेल असेही भुजबळ म्हणाले.

अनलॉक लागू करतांना शाससाने सुरक्षितता बाबतच्या काही अटी घालून दिलेल्या आहेत. त्याचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. मास्क वापरला पाहिजे, सुरक्षित अंतर तसेच सॅनिटायझरचा वापर नियमित केला पाहिजे. हे सर्व आपल्याच हातात आहे. त्यामुळे लॉडाऊनचा निर्णय देखील नाशिककरांच्याच हातात आहे. त्यांनीच अधिक खबरदारी घेतली पाहिजे. नाशिक जिल्ह्यात सध्यातरी लॉकडाऊन लागू करण्याबाबतच विचार करण्यात आलेला नाही. मात्र रूग्ण संख्येत वाढ होत राहिल्यास नाईलाजाने जिल्ह्याबाबत पुनर्विचार करावा लागेल असेही भुजबळ म्हणाले.